PMC Water Supply Department | खैरेवाडीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला | पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाने केली व्यवस्था 

HomeपुणेBreaking News

PMC Water Supply Department | खैरेवाडीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला | पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाने केली व्यवस्था 

गणेश मुळे Apr 12, 2024 2:50 PM

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी (१७ एप्रिल) रोजी शहरातील या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!
Pune Water Supply News | पाणीकपातीमुळे टँकरची संख्या १४०० वरून १७०० वर | पाणी वितरण व्यवस्थेत मोठ्या कामाची गरज  | महापालिका प्रशासनाचा मुख्य सभेत खुलासा
PMC Chief Engineer Abuse | अधिकारी, कर्मचारी शिवीगाळ, मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी पुणे महापालिका कधी धोरण तयार करणार?

PMC Water Supply Department | खैरेवाडीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला | पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाने केली व्यवस्था

No Water No Vote – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या खैरेवाडी परिसरात नागरिकांना भीषण पाणीटंचाई जाणवत होती. या त्रासाला कंटाळून नागरिकानी ‘नो वॉटर नो वोट’ अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. याबाबत जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी  गंभीरपणे लक्ष देत पुणे महापालिका आयुक्तांना (Pune Municipal Corporation Commissioner) यात लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. (PMC Water Supply Department)
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील खैरेवाडी परिसरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत बॅनर लावले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले होते. लोकांना मतदानावर बहिष्कार टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी लोकांना पाणी द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ दिवसे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले होते. (Loksabha Election Voting)
याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी सांगितले कि, विद्यापीठ परिसरात  24*7 योजने अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. ही टाकी कार्यान्वित करून त्याला खैरेवाडी भाग जोडून दिला आहे. त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जगताप यांनी सांगितले कि  गणेशखिंड परिसरात रस्त्याचे काम चालू असल्याने बरीच पेंडिंग कामे होती. त्यामुळे पाणी मिळण्यास उशीर होत होता. मात्र आता जवळपास 5 हजार लोकांची पाण्याची समस्या सुटली आहे.