PMC Standing Committee | अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे स्थायी समितीची बैठक तहकूब | समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी दर्शवली नाराजी

Homeadministrative

PMC Standing Committee | अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे स्थायी समितीची बैठक तहकूब | समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी दर्शवली नाराजी

Ganesh Kumar Mule Jun 04, 2026 5:21 PM

PMC Joint Municipal Commissioner |  मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांना सह महापालिका आयुक्त असे नामभिधान देण्यास मंजुरी | खातेप्रमुख संवर्गात दहा वर्षापेक्षा जास्त सेवा केलेल्या खातेप्रमुखांचे नामभिधान ‘सह महापालिका आयुक्त (जॉइंट म्युनिसिपल कमिशनर)’ करण्यास मान्यता  
You are Prize | महापालिका कर्मचाऱ्यांनो आणि अधिकाऱ्यांनो तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या! | तुमच्यापेक्षा कुणीही आणि काहीही महत्वाचे नाही! 
Good News for PMC Employees | कामावर असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिले जाणार ५ लाख! | कामगार कल्याण विभागाच्या प्रस्तावाला धोरणात्मक मान्यता

PMC Standing Committee | अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे स्थायी समितीची बैठक तहकूब | समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी दर्शवली नाराजी!

| पावसाळापूर्व कामांचा आढावा रखडला

| आयुक्तांनी हजेरीचे आदेश देऊनही अतिरिक्त आयुक्त व खातेप्रमुख गैरहजर

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची आज होणारी साप्ताहिक बैठक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे तहकूब करण्यात आली. महापालिका आयुक्तांनी उपस्थित राहण्याचे निर्देश देऊनही अतिरिक्त आयुक्त आणि काही खातेप्रमुख बैठकीस उपस्थित न राहिल्याने समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी हा निर्णय घेतला. (PMC Officers)

स्थायी समितीत मान्य केलेल्या ठरावानुसार, आजच्या बैठकीत आगामी पावसाळ्यापूर्व करावयाची कामे, नाले सफाई, शालेय वर्ष सुरू होण्यापूर्वीचे नियोजन तसेच पालखीपूर्व कामे या अत्यावश्यक विषयांचा आढावा घेण्याचा सदस्यांचा मानस होता.

मात्र प्रशासनाने या महत्त्वाच्या कामांप्रती गांभीर्य न दाखवल्याचे आणि उदासिनता दिसून आल्याचे लक्षात घेऊन आजची सभा तहकूब करण्यात आल्याचे ठरावात म्हटले आहे.

अध्यक्षांनी दिलेल्या आदेशानुसार ही बैठक आता गुरुवार, ११ जून रोजी सकाळी १:३० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

पावसाळा तोंडावर आला असताना नाले सफाईसारखी कामे रखडल्याने शहरात पाणी तुंबण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच शाळा सुरू होण्यापूर्वीच्या तयारीचा आणि आषाढी पालखीपूर्व कामांचा आढावा न झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बैठकीत चर्चा करण्यासाठी अधिकारी असणे गरजेचे होते, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: