Ananya Bharat Valhekar Brithday | क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार व गुणगौरव पुरस्कार

HomeपुणेSport

Ananya Bharat Valhekar Brithday | क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार व गुणगौरव पुरस्कार

गणेश मुळे Feb 10, 2024 3:29 PM

Khadakwasla Water Discharge | खडकवासला धरणातून आज 5 वाजता 1 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार
Pune | Canal Advisory Committee meeting on Saturday! | will discussion about water planning
Ajit Pawar on Kundmala | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट

Ananya Bharat Valhekar Brithday | क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार व गुणगौरव पुरस्कार

 

अनन्या भरत वाल्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा क्रीडा संकुल व स्मिता स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पै खाशाबा जाधव या नावाने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार व गुणगौरव पुरस्कार तसेच इंदिरामाई स्वस्त थाळी व चौपाटीचे उद्घाटन रमेश बागवे, बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले, पिंपरी चिंचवड काँग्रेस पार्टी अध्यक्ष डॉ कैलास कदम,  यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती पुरस्कार विजेते राजेश इरले, अशोक गुंजाळ, प्रवीण बोरसे, मिलिंद पठारे, अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिगळे, तसेच रघुनाथ सावंत, विनायक तुम्मा, इकबाल शेख, सुनिल साठे, संजय मराठे, सुशील वारजूकर, यांना पै खाशाबा जाधव जीवन गौरव पुरस्काराने तसेच गुणगौरव पुरस्कारर आरती संभाजी भेगडे, अमोल पांडे, शामल शिंदे,, भगवान श्रीमंदिलक अरविंद बी पाटील, बलभीम भोसले, समील ऑटी, शाताराम भालेकर, उमेश पाटील प्रकाश गायकर, दिनेश शिंगारम, लतींद्र भिंगारे, प्रसाद वडघुले, अरविंद कांगणे, मनोहर पवार, रणजीत पाटील, सुधा खोले, रमेश मोरे, काळूराम लांडगे, सुरेश धरणे, अजय कांबळे, सुचित्रा हरपळे, मनिषा पाटील, यांना गुणगौरव पुरस्कार देऊन वरील मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पिंपरी चिंचवड काँग्रेस पार्टी वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले. याप्रसंगी वाल्हेकर वाडीतील हजारोंनी लोक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुप्रिया वाल्हेकर, जयश्री खैरे, वैशाली वाल्हेकर, मीना वाल्हेकर, शिंपीताई गणेश कोळपे ,आप्पा कांबळे, गौरव खैरे ,यश वाल्हेकर, आकाश खैरे, शुभम वाल्हेकर, श्रीमंत कोळपे, गजानन गायकवाड, रुपेश केसरकर, चंद्रकांत चिंचवडे, साहिल शर्मा यांनी अहोरात्र प्रयत्न केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला