Navale Bridge Traffic Pune | ऐतिहासिक वास्तू चे धिंडवडे नाचवण्याचे काम प्रशासन करत आहे का?   | स्वराज्य पार्टीचा महापालिका प्रशासनाला सवाल

HomeपुणेBreaking News

Navale Bridge Traffic Pune | ऐतिहासिक वास्तू चे धिंडवडे नाचवण्याचे काम प्रशासन करत आहे का? | स्वराज्य पार्टीचा महापालिका प्रशासनाला सवाल

गणेश मुळे Jan 12, 2024 2:24 AM

PMC Employees Promotion | 25% जागांवर चतुर्थश्रेणी सेवकांमधून लिपिक टंकलेखक पदावर काही सेवकांचीच बढती का अडवली? | महापालिका कर्मचाऱ्यांचा सवाल
Former Mayor | PMC Pune | माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनानिमित्त महापालिकेची कार्यालये ठेवण्यात आली बंद
Pune Mahanagarpalika Shikshak Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये 260 पदांची शिक्षक भरती

Navale Brigde Traffic Pune | ऐतिहासिक वास्तू चे धिंडवडे नाचवण्याचे काम प्रशासन करत आहे का?

| स्वराज्य पार्टीचा  महापालिका प्रशासनाला सवाल

Navale Bridge Pune Traffic | आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk pune) येथील भुयारी मार्गाला लागून असणारा रस्ता की जो रस्ता कात्रज ते नवले ब्रिज (Katraj: Navale bridge) या महामार्गाला जोडणार असा प्रकल्प आहे. रस्त्यावर खड्डे झाले आहेत. भिंतीवर  ऐतिहासिक वास्तू चे चित्रभित्ती वर प्रशासन खर्च कोणत्या कारणासाठी करते? या ठिकाणी मद्यपींचा वावर आहे. या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू चे धिंडवडे नाचवण्याचे काम प्रशासन करत आहे का? असा सवाल स्वराज्य पार्टीचे सदस्य आशिष भोसले (Ashish Bhosale Swaraj) यांनी केला आहे. (Pune News)
भोसले यांच्या निवेदनानुसार गेले अनेक वर्षे बायपास रस्त्याचे काम मंदगतीने चालू आहे. या भागात पिण्याचे पाणी अजून पोहचले नाही. दुप्पट तिप्पट टॅक्स असून देखील प्रशासन जाणूनबुजून हे करत आहे. भित्तिचित्रे लावून काय साध्य होणार अनेक वर्षे  मंदगतीने काम सुरू असून भुयारी मार्ग ते सिंहगड कॉलेज पर्यंत   ट्राफिक रोज सातत्याने होत आहे. नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.रोज सातत्याने असे अपघाताचे सत्र चालू असून प्रशासनाने यावर तोडगा काढून  हा मार्ग नागरिकांसाठी चालू करावा.  सुस्वच्छ आणि योग्य रस्ते,  या सर्व सुविधांसाठी आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा करत आहोत. खरं तर या ठिकाणी तात्काळ बाणेर/पाषाण/वारजे माळवाडी सारखा प्रशस्त मोठा  भुयारी मार्ग अपेक्षित असून  पुणे महानगरपालिका, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय, पुणे वाहतूक विभाग,राज्य महामार्ग विभाग आणि राष्टीय महामार्ग विभाग आणि  PMRDA आयुक्त यांनी विशेष  लक्ष घालणे गरजेचे झाले आहे. कारण जवळच असलेल्या महाराष्टातील “शिवसृष्टी” या भव्य दालनाचे काम पूर्णत्वास येत असून त्या नंतर अधिकच वाहतूक  परिस्तिथी गंभीर होऊ शकते. या गंभीर वाहतुक कोंडीची तात्काळ  दखल घ्यावी अन्यथा आम्हाला ठिय्या आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. असा इशारा  आशिष भोसले यांनी दिला आहे.
—-