Report of Ward Structure : PMC election : महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल निवडणूक आयोगाला  सादर  : सरकारच्या भूमिकेकडे लक्ष 

HomeपुणेBreaking News

Report of Ward Structure : PMC election : महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल निवडणूक आयोगाला  सादर  : सरकारच्या भूमिकेकडे लक्ष 

Ganesh Kumar Mule Mar 08, 2022 4:01 PM

Prashant jagtap | भाजप करत आहे लोकशाहीचा खून | एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे निवडणुकांना का घाबरतात..? | प्रशांत जगताप यांचा सवाल
Pune BJP | पुणे शहर भाजप निवडणुकीसाठी सज्ज | शहराध्यक्ष धीरज घाटे
Ward Structure : PMC election: महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा सुधारित आराखडा निवडणूक आयोगाला सादर : इच्छुकांची प्रतीक्षा संपणार

महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल निवडणूक आयोगाला  सादर

: सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

पुणे: पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्रारूप प्रभागरचनेवरील ( Ward Structure)  सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल महापालिकेने निवडणूक आयोगाकडे (State election commission) सादर केला आहे. अहवाल ५  मार्चऐवजी ८ मार्च रोजी सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा अहवाल सादर केला आहे. दरम्यान सरकारने नुकतेच नवीन बिल आणल्यामुळे या प्रभाग रचेनेचे काय होणार याबाबत आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग आहे. याची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. २४ व २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतल्यानंतर आता त्याचा अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पूर्व पुणे आणि पश्चिम पुण्यातील प्रभाग रचनेवर आक्षेप असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता आहे. शिवाय पण संपूर्ण शहराच्या हरकतींचा अद्याप विचार झालेला नाही. त्याचा अहवाल २ मार्चपर्यंत आयोगाला सादर करणे आवश्‍यक होते. पण हे काम अपूर्ण असल्याने आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आयोगाकडून ५ मार्च पर्यंतची मुदत वाढवून दिली होती. मात्र ५ ला देखील हा अहवाल सादर होऊ शकला नाही. अहवाल ५  मार्चऐवजी ८ मार्च रोजी सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा अहवाल सादर केला आहे. दरम्यान सरकारने नुकतेच नवीन बिल आणल्यामुळे या प्रभाग रचेनेचे काय होणार याबाबत आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सर्वस्वी निर्णय हा राज्य सरकारच्या हाती आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.