Freedom of Speech | भारतामध्ये‌ माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट : ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले

HomeपुणेBreaking News

Freedom of Speech | भारतामध्ये‌ माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट : ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले

गणेश मुळे Apr 26, 2024 2:49 PM

Pune Congress | भाजप आमदार सुनिल कांबळे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, आमदार माधुरी मिसाळ यांचे बंधू मनोज देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी – अरविंद शिंदे
Congress Guarantee Card | काँग्रेसचे गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणार | मोहन जोशी यांची माहिती
The state’s law and order situation is dire. Is Maharashtra’s Home Department being run like “Ghashiram Kotwal”? The state needs a full-time, capable Home Minister – Harshwardhan Sapkal 

Freedom of Speech | भारतामध्ये‌ माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट : निरंजन टकले

 

Freedom of Speech – (The Karbhari news service) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील लोकांप्रती आपले काय‌ दायित्व आहेहे माहितच नाहीत्यामुळे त्यांनी दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. उलट त्यांनी वृत्त वाहिन्या असोत‌ किंवा मुद्रुत माध्यमं असोतसर्वांचे स्वातंत्र हिरावून घेतले आहे. यामुळे भारतामध्ये‌ माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट झाली आहेअशी टिका ज्येष्ठ पत्रकार व प्रदेश काँग्रेसचे स्टार प्रचारक निरंजन टकले यांनी केली.

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीइंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टकले बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, सरचिटणीसवीरेंद्र किराडराज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, राज अंबिके,  इत्यादी उपस्थित होते. प्रारंभी राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

 

टकले म्हणालेनरेंद्र मोदी यांनी ज्या – ज्या ठिकाणी डोकं टेकवलेते सर्व संपवण्याचे काम केले आहे. मग ती संसद असोतलालकृष्ण आडवाणी असोत किंवा इतर नेते असोत. मोदी धार्मिक भावनेला आवाहन देण्याचे काम करतात. काँग्रेसने या‌ देशाला संविधान दिलेत्याच संविधानानुसार देश‌ चालतो. देश मनुस्मृतीनुसार नक्कीच चालणार नाही. मात्र भाजपला देश मनुस्मृतीनुसार चालवायचा आहे. त्यासाठी त्यांना देशातील संविधान हद्दापार करायचे आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजपचेच नेते बोलत आहेत. त्यानंतर टिका होऊ लागल्याने मोदींनी संविधान बदलणार नाहीअशी गॅरंटी दिली.

 

काँग्रेसच्या‌ जाहीरनाम्यात हिंदू मुस्लिम उल्लेख कुठेच नाहीमात्र भाजप व मोदींकडून धादांत खोटा प्रचार केला जात आहे. देशातील  ४८ लाख लोकांनी काँग्रेसचा जाहीरनामा डाऊनलोड‌ केला. राहुल गांधीप्रियंका गांधी यांच्या प्रत्येक सभेकडे भाजपचे बारीक लक्ष आहेते लगेच त्यावर बोलतात. काँग्रेसचा जाहीरनामा लोकांच्या हिताचा आहेलोक‌तो‌ पसंत करत आहेतम्हणून भाजपकडून जाहीरनाम्यावर टिका केली जात आहे. मंगळसुत्राचा वाद निर्माण केला जात आहे.

 

उलट भाजपच्या जाहीरनाम्यात ५३ वेळा मोदींचा फोटो आहेयात बेकारी व बेरोजगारीचा उल्लेखही नाही. भाजपचा जाहीरनामा अत्यंत पोकळ आहे.  मोदी जितके खोटे बोलतील तितका काँग्रेसचा पाठिंबा वाढेल. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आणखी भाजपच्या पायाखालची वाळू घसरणार आहे.

अग्निवीर योजना मोदींनी राजकारणात आणली. महाराष्ट्रात अग्निवीर योजना देवेंद्र फडणवीस‌ यांनी आणली. शिंदे व पवार भाजपचे अग्निवीर आहेत. या दोघांना दोघे मिळून चार वर्षे मिळणार आहेत.

 

दहा वर्षात मोदी‌ सरकारने नागरिकांची आतोनात हानी केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात मोदी व भाजपबद्दल प्रचंड रोष आहे. दक्षिणेतल्या राज्यात भाजपचा एकही खासदार निवडून येणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ४० जागा निवडून येतीलअसा विश्वासही टकले यांनी व्यक्त केला.