Alandi Flood | आळंदीत पूरपरिस्थितीत अडकलेल्या ४०८ भाविकांची सुरक्षित सुटका

Homeadministrative

Alandi Flood | आळंदीत पूरपरिस्थितीत अडकलेल्या ४०८ भाविकांची सुरक्षित सुटका

Ganesh Kumar Mule Jul 06, 2026 2:08 PM

Home loan closing | गृहकर्ज बंद करताना या खास गोष्टींची काळजी घ्या |  तुम्हाला नंतर काळजी करण्याची गरज नाही | जाणून घ्या तपशील
Pune Mayor Election | पुणे शहराचा पहिला नागरिक ठरणार ६ फेब्रुवारीला!
Sant Tukaram Maharaj | PM Narendra Modi | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

Alandi Flood | आळंदीत पूरपरिस्थितीत अडकलेल्या ४०८ भाविकांची सुरक्षित सुटका

| आळंदीतील बचावकार्य युद्धपातळीवर; प्रशासनाचे २४ तास अलर्ट मोडवर काम

 

Pune Rain News – (The Karbhari News Service) – इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या भाविकांची आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ यांच्या समन्वयातून सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. प्रशासनाने बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेतले असून आतापर्यंत एकूण ४०८ भाविकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. भाविक आणि २० पोलीस कर्मचारी अडकले होते. पीएमआरडीएच्या आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (PDRF) जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले आणि सर्व भाविक व २० पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

कोठून किती भाविकांची सुटका?
पूरग्रस्त भागात अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी रात्रंदिवस काम केले.

– ज्ञानेश्वरी मंदिर परिसर: २२० भाविक
– इंद्रायणी नगरी: १० भाविक
– ठाकूरबुवा मंडप: ६० भाविक
– गोपाळपुरा: २८ भाविक

याशिवाय इतर ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही शोधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

गुराढोरांचीही सुटका
केवळ माणसेच नाही तर पूरग्रस्त भागातील १५० गायींचीही बचाव पथकांनी सुरक्षित सुटका करून त्यांना उंच आणि सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

प्रशासन २४ तास सज्ज
आळंदी नगरपरिषद, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तैनात आहेत. पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर ड्रोन आणि बोटींच्या मदतीने सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. अन्न, पाणी आणि औषधांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “सध्या सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. अजूनही काही ठिकाणी पाणी आहे, त्यामुळे बचावकार्य सुरूच राहणार आहे.”

नागरिकांना आवाहन
प्रशासनाने नागरिक आणि भाविकांना आवाहन केले आहे की,
1. अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा.
2. नदीकाठ आणि सखल भागात जाऊ नये.
3. आवश्यकता असल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा.

सध्या आळंदीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणा अलर्टवर ठेवल्या आहेत.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकही प्रशासनाला सहकार्य करत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: