Congress Vs BJP : भाजप मिस कॉलने करोडो सभासद केले अशी घोषणा करतो  : कॉंग्रेसचा भाजपला टोला

HomeपुणेBreaking News

Congress Vs BJP : भाजप मिस कॉलने करोडो सभासद केले अशी घोषणा करतो  : कॉंग्रेसचा भाजपला टोला

Ganesh Kumar Mule May 13, 2022 11:53 AM

Bharat Jodo Yatra :2 | भारत न्याय यात्रा : 14 जानेवारी ला मणिपूर मधून सुरुवात
Kasba Constituency Civic Issues | कसबा मतदारसंघातील नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्ताकडे मागणी 
Property Tax Bills : वाढीव मिळकतकर बिलांसाठी कायदेशीर सल्ला घेणार : भाजपच्या शिष्टमंडळाला महापालिका आयुक्तांचे आश्वासन 

भाजप मिस कॉलने करोडो सभासद केले अशी घोषणा करतो

: कॉंग्रेसचा भाजपला टोला

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रिया चालू आहे. पुण्याचे निवडणुक निर्णय अधिकारी दौलत राम नायक यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

     आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये संघटनात्मक निवडणुका घेण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी आज दौलत राम नायक यांच्या उपस्थितीत ही बैठक बोलविण्यात आली आहे. बुथ पातळीवरून शहर पातळीपर्यंत टप्प्या टप्प्याने निवडणुका घेण्यात येणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण संघनात्मक निवडणुक व्‍यवस्थित पार पाडू.’’

     मुख्य निवडणूक अधिकारी दौलत राम नायक म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेस कार्यकारिणीच्या आदेशानुसार देशात काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संघटनात्मक निवडणुका पारदर्शक करण्यासाठी राहुल गांधी यांनी यावेळी डिजीटल सभासद नोंदणीची प्रक्रिया राबविली. या डिजीटल सभासद नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी बुथ पातळीवर सभासद नोंदणी केली आहे. बुथ पातळीवरची निवडणुक २८ मे पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यानंतर ब्लॉक व शहर पातळीवरच्या निवडणुका होणार. ज्यांनी संघटनेसाठी काम केलेले आहे त्यांना संघटनेमध्ये स्थान देण्यात येणार आहे. १० जून पर्यंत शहर काँग्रेची निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाची निवडणुक ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे.’’

     यानंतर माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाची संघटनात्मक निवडणुक मिस कॉलने करता येत नाही. भारतीय जनता पक्ष मिस कॉलने करोडो सभासद केले अशी घोषणा करतात. वास्तविक पाहता मिस कॉलद्वारे केलेली  निवडणुक प्रक्रिया पारदर्श नसते. काँग्रेस एकमेव पक्ष आहे की ज्याची निवडणुक प्रक्रिया बुथ पातळीवरून अखिल भारतीय पातळीपर्यंत पारदर्शक पध्दतीने राबविली जाते. मला खात्री आहे की, आपणा सर्वांच्या सहकार्याने आपण संघटनात्मक निवडणूक यशस्वीपणे पार पाडू.’’

     यावेळी माजी आमदार माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांची भाषणे झाली.

      यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस अरविंद शिंदे, कमल व्‍यवहारे, पुजा आनंद, गोपाळ तिवारी, रमेश अय्यर, लता राजगुरू, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, रफिक शेख, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, प्रविण करपे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, विजय खळदकर, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, सुनील घाडगे, शोएब इनामदार, प्रदीप परदेशी, साहिल केदारी, शिलार रतनगिरी, राहुल तायडे, शानी नौशाद, स्वाती शिंदे, प्रकाश पवार, सुरेश कांबळे, रजनी त्रिभुवन, अंजली सोलापूरे, गीता तारू, पपिता सोनावणे, शारदा वीर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.