Barshi: वगळलेल्या 48 गावांचेही होणार पंचनामे : बार्शी तालुक्याला दिलासा

HomeBreaking Newsमहाराष्ट्र

Barshi: वगळलेल्या 48 गावांचेही होणार पंचनामे : बार्शी तालुक्याला दिलासा

Ganesh Kumar Mule Oct 14, 2021 3:07 AM

Pune residents beware.. Constitution in danger.. Devendra Fadnavis resigns |  NCP Party – SharadChandra Pawar
Pune PMC Encroachment Action | वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई
Pune Unlock : PMC : पुणेकरांना महापालिकेचा दिलासा  : निर्बंध केले शिथिल

वगळलेल्या 48 गावांचेही होणार पंचनामे

: राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे आदेश

बार्शी : बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीतून वगळलेल्या ४८ गावांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदे. महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना दिलेले आहेत. अशी माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. नुकतीच आमदार राऊत यांनी मंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले होते.

: बार्शी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

याबाबत आमदार राऊत यांनी सांगितले कि, बार्शी तालुक्यात मागील १५  दिवसांत सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे. तालुक्‍यात झालेल्या या अतिवृष्टीमुळे ६ मंडलांमधील गावांमध्ये अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले आहेत. परंतु अतिवृष्टीच्या निकषातील तांत्रिक अडचणीमुळे तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या मंडलांस अतिवृष्टीतून वगळण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन, संताप व्यक्त होत आहे. शेतकरी बांधवांच्या या संतप्त भावना व बार्शी तालुक्यातील या ४ मंडलांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती व वास्तव महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमोर मांडले. या विषयाबाबत त्यांच्याशी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाल्यानंतर, संपूर्ण माहितीचे पत्र मंत्री महोदय यांना दिले. यावर त्यांनी तात्काळ  जिल्हाधिकारी सोलापूर यांना याबाबत पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिलेला आहे. असे ही राऊत म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0