महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट   : राज ठाकरेंचा सरकारवर आरोप   : महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न

HomeपुणेPolitical

महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट : राज ठाकरेंचा सरकारवर आरोप : महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न

Ganesh Kumar Mule Sep 05, 2021 6:50 AM

EVM Machine VVPAT Slip | ‘ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ,दिनांक छापली जावी | सर्वोच्च न्यायालयात दाखल रिट याचिकेवर उद्या सुनावणी 
Pune Metro News | जनतेच्या पैशावर भाजपचा प्रचार | आयजी च्या जीवावर बायजी उदार | माजी आमदार मोहन जोशी
PMC Teachers Agitation Update | शिक्षण सेवक आमरण उपोषण 4था दिवस  |  उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असताना प्रस्ताव नगरविकास विभागाकडे का पाठवला?

महापालिकांवर प्रशासक नेमण्याचा सरकारचा कट

: राज ठाकरेंचा सरकारवर आरोप

: महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न

पुणे: राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि रणनिती आखण्यासाठी राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत.

: सरकारलाच निवडणूक नको

सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुनही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. केंद्र आणि राज्य सरकारकडून आगामी काळातील सणांवर घालण्यात आलेल्या निर्बंधावरुन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. केंद्र सरकारनेही दहीहंडी आणि गणेशोत्सव सणांसाठी निर्बंध लागू केल्यासंदर्भात पत्रकाराने राज ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावर, मला वाटतंय की, या सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बरं चाललंय. कारण, कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरायचं नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा आणि बरं चाललंय सरकाराचं, असे म्हणत राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारांवर गंभीर आरोप केले आहेत. नुसतं त्या कोरोनाची दुसरी लाट येणार, तिसरी लाट येणार, अशी भीती दाखवली जाते. हे कुठपर्यंत चालणार? असा सवालही राज यांनी उपस्थित केला आहे. “राज्य सरकारलाच निवडणुका नको आहेत. निवडणूकघेण्याची सरकारचीच इच्छा नाही. याकडे आपण गांभीर्यानं पाहायला हवं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा घाट सुरू आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.

: ओबीसी जनगणना करा आणि निवडणुका घ्या

ओबीसी आरक्षण नसल्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयाला काहीच हरकत नाही. पण यामागे सरकारचं काही काळंबेरं असेल आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या आडून सरकार महापालिकांवर प्रशासक नेमून कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा विचार आपण करायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले. ओबीसींची जनगणना करुन निवडणूक घेण्यास काहीच हरकत नाही, असंही ते म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0