Water Crisis in pune | पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी! 

HomeपुणेBreaking News

Water Crisis in pune | पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी! 

Ganesh Kumar Mule Jun 28, 2022 3:20 PM

Khadakwasla Water Discharge | खडकवासला धरणातून आज 5 वाजता 1 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार
Canal Advisory Committee : यंदा उन्हाळ्यात पाणी कपात नाही  : पुणे शहराला मिळणार मुबलक पाणी 
Pune Water Cut | पुणेकरांना रोज पाणी मिळेल याची व्यवस्था करा | माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांची मागणी

पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी!

| महापालिका लवकरच निर्णय जाहीर करणार

पुणे | पावसाने ओढ दिल्याने पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये खूपच कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच पावसाची कुठलीच चिन्हे दिसेनात. त्यामुळे पुणेकरांवर पाणीसंकट ओढवले आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. पुणेकरांना आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याचे नियोजन देखील महापालिका प्रशासनाने तयार केले आहे. या आठवड्यापासूनच म्हणजे गुरुवार – शुक्रवार पासूनच एक दिवसाआड पाणी देण्याबाबत अमल करण्यात येणार आहे. अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
पुणे शहराला खडकवासला धरण साखळीच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय भामा आसखेड आणि पवना धरणातून देखील पाणी घेतले जाते. शहर आणि समाविष्ट गावांना या धरणातून पाणी दिले जाते. शहराला महिन्याला 1.50 टीएमसी पेक्षा अधिक पाण्याची आवश्यकता आहे. मात्र शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा अभाव आहे. जून महिना संपत आला तरीही पाणीसाठा वाढलेला नाही. आहे तो पाणीसाठा नाममात्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात देखील अपुरा पाऊस असणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांवर पाणीसंकट ओढवले आहे. यामुळेच महापालिका प्रशासन पाणीकपात करण्याचा निर्णय घेत आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत आज बैठक होणार होती. मात्र ती होऊ शकली नाही. मात्र आयुक्तांच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा विभागाने एक दिवसाआड पाणी देण्याबाबत नियोजन सुरु केले आहे. शहरात पाणीपुरवठा विभागाचे तीन झोन आहेत. यामध्ये पर्वती, एसएनडीटी आणि लष्कर  विभागाचा समावेश आहे. या अंतर्गत येणाऱ्या परिसरात कशा प्रकारे एक दिवसाआड पाणी देण्यात येईल याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कारण काही परिसरात एक दिवसाआड पाणी देण्यात तांत्रिक अडचणी आहेत. तिथे पाणी कमी कसे देता येईल. याचेही नियोजन सुरु आहे.
प्रशासनाच्या या नियोजनावर या आठवड्यातच अंमल करण्यात येणार आहे. लवकरच महापालिकेकडून याची घोषणा केली जाईल.