Pune School Closed News | पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ | अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ६ जुलैला पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Homeadministrative

Pune School Closed News | पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ | अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ६ जुलैला पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Ganesh Kumar Mule Jul 05, 2026 10:48 PM

Pune News | पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना २१ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी
Pune Zilla Parishad | पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड | अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे;उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील
Khadakwasla Dam Water | खडकवासला समूहात ४.१३ टीएमसी पाणी साठा | पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Pune School Closed News | पुणे जिल्ह्यात उद्या ‘रेड अलर्ट’ | अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ६ जुलैला सर्व शाळांना सुट्टी जाहीर

 

Pune News – (The Karbhari News Service) – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ६ जुलै रोजी पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. संभाव्य अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ही माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, “हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार उद्या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अंगणवाड्या उद्या बंद राहतील.”

*नागरिकांसाठी प्रशासनाचे आवाहन*

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी *जितेंद्र डुडी* यांनी केलेले महत्त्वाचे आवाहन:

1. *अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये*
2. *नदी, नाले, ओढे आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे*
3. *पडझडीच्या शक्यतेमुळे जुनी घरे आणि झाडांखाली उभे राहू नये*
4. *स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे*

*यंत्रणा सज्ज*

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खालच्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे.

पुढील २४ तास हवामान विभागाकडून अपडेट घेतले जातील. परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0