Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत  करा | काँग्रेस आक्रमक

HomeपुणेBreaking News

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत करा | काँग्रेस आक्रमक

कारभारी वृत्तसेवा Jan 09, 2024 8:07 AM

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | काँग्रेस कडून पुणे लोकसभा समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे!
Katraj Dairy Pune | Play Ground Reservation | कात्रज येथील मैदानाचे आरक्षण उठवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीचे वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन
Phule Smarak Pune | महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकांच्या विकास आराखड्यांचा  आढावा

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत  करा | काँग्रेस आक्रमक

 

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे : आठ वर्षाहून अधिक काळ लांबलेला पुणे मेट्रोचा (Pune Metro) पहिला टप्पा पूर्ण करून त्यावर लवकरात लवकर वाहतूक चालू करा. पुणेकरांच्या संयमाचा अंत होऊ देऊ नका, असा इशारा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी मेट्रो प्रशासन आणि भाजप सरकारला आज सोमवारी दिला. (Pune Airport | Pune Metro | Pune Congress)

पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करा, स्वारगेट ते कात्रज मार्ग (Swarhet katraj Underground Metro) काम लवकर सुरू करा, लोहगांव विमानतळापर्यंत (Pune Lohgaon Airport) मेट्रो सेवा द्या, अशा मेट्रो संबंधीच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेट्रो संचालक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या कामाचे भूमीपूजन सुमारे आठ वर्षापूर्वी केले. त्यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला. मेट्रो लवकरच धावू लागेल, असे आश्वासन मोदी यांनी दिले. आठ वर्ष उलटली तरी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. भाजप नेत्यांच्या सुप्त संघर्षात मेटुोचे काम लांबत गेले, त्यामुळे लाखो रूपयांनी खर्च वाढत गेला.ज्या पुणेकरांनी भाजपला महापालिकेत सत्ता दिली, आमदार, खासदार निवडून दिले, पण पुणेकरांना मेट्रो सेवेचा पुरेपूर लाभ भाजप देवू शकले नाही. याकडे भाजपचे त्यांच्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले, असे मोहन जोशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.

या आंदोलनात दत्ता बहिरट, सुनिल मलके, मंजुर शेख,शेखर कपोते, प्रवीण करपे, शाबिर खान, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, विनोद रणपिसे, रोहन सुरवसे पाटील, किशोर मारणे, सुरेश कांबळे, रामविलास माहेश्वरी, बाबा नायडू, महेंद्र चव्हाण, राजाभाऊ कदम, साहील राऊत, अविनाश अडसूळ, सचिन बहिरट, बाबा सय्यद, अनिकेत सोनावणे आदी कार्यकर्ते सामील झाले होते.