National Book Trust | ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’च्या तब्बल ३३ पुस्तकांचे पुणे पुस्तक महोत्सवात एकाचवेळी प्रकाशन

HomeपुणेBreaking News

National Book Trust | ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’च्या तब्बल ३३ पुस्तकांचे पुणे पुस्तक महोत्सवात एकाचवेळी प्रकाशन

कारभारी वृत्तसेवा Dec 19, 2023 2:09 PM

Hemant Rasane | गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याप्रती हेमंत रासने यांची कृतज्ञता | संघाच्या मोतीबाग कार्यालयाला भेट
PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे पुन्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी | संदीप खलाटे यांच्याकडील पदभार काढला 
Dr. Ganesh Devi | ‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

National Book Trust | ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’च्या तब्बल ३३ पुस्तकांचे पुणे पुस्तक महोत्सवात एकाचवेळी प्रकाशन

National Book Trust | पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (National Book Trust) पुण्यात अनुवाद कार्यशाळा झाली होती. या कार्यशाळेतून तयार झालेल्या ३३ पुस्तकांचे प्रकाशन मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते पुणे पुस्तक महोत्सवात झाले. (Pune Book Festival)

प्रकाशन कार्यक्रमाला साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, आनंद काटीकर या वेळी उपस्थित होते. हिंदी, इंग्रजी या भाषांतील पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. (Pune Pustak Mahotsav)

अनुवाद कार्यशाळा या पुणे पुस्तक महोत्सवाचे बीज होती. भाषा आणि संस्कृतीला वेगळे करता येत नाही. मानव संवाद करू शकतो म्हणून माणूस श्रेष्ठ आहे. संस्कृतीचे वाहक म्हणून वाचकांनी करायचे आहे. बालसाहित्य समाजाची संरचना करते. त्यामुळे सकस बालसाहित्याची निर्मिती अत्यावश्यक आहे, असे युवराज मलिक यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाप्रमाणेच अतिशय नेटका पुस्तकांचा महोत्सव पुण्यात झाला आहे. अनुवाद व्यापक संकल्पना आहे. अनुवादाची फार प्राचीन परंपरा आहे. ललित पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद ७०च्या दशकात सुरू झाला. गेल्या पन्नास वर्षांत अनुवादक म्हणून पॅपिलॉनसह अनेक पुस्तकांचा अनुवाद करता आला. सुरुवातीला अनुवादित साहित्य गौण समजले जायचे, पण आता अनुवादित साहित्याला प्रतिष्ठा मिळाली. अनुवाद ही स्वतंत्र कला आहे हे अधोरेखित झाले, असे रवींद्र गुर्जर म्हणाले.

लहान मुलांसाठी एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तके प्रकाशित होणे दुर्मीळ आहे. मुलांसाठी सोपे, सुटसुटीत लिहावे लागते, पुस्तके आकर्षक असावी लागतात. मुलांच्या पुस्तकांसाठी खूप विचारकरावालागतो. मुलांनी वाचण्यासाठी खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास ते काम करत आहे हे महत्त्वाचे आहे, असे मनोगत डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केले.