Maharashtra Day Special Article | असा हवा महाराष्ट्र माझा – अपर्णा शिखरे

Homeadministrative

Maharashtra Day Special Article | असा हवा महाराष्ट्र माझा – अपर्णा शिखरे

Ganesh Kumar Mule May 01, 2025 8:51 AM

PMC Pune Employees | महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे महापालिका कर्मचाऱ्यांना भोवणार 
Maharashtra Day | राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनाला महापालिका कर्मचाऱ्यांबाबत महापालिका आयुक्तांचे हे नवीन आदेश 
Maharashtra Diwas | महाराष्ट्र दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व? 

Maharashtra Day Special Article | असा हवा महाराष्ट्र माझा – अपर्णा शिखरे

 

सर्वांना सस्नेह जय जिजाऊ,

ज्याच्या मुळे आपल्याला स्वराज्य मिळाले त्या राष्ट्र मातेला पहिलं वंदन करून बोलते आहे. स्वराज्या साठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज लढले , पण धर्मा साठी लढले असा उल्लेख करून आज देशात चुकीच्या गोष्टी होत आहेत.  मुस्लिम द्वेष,धर्माचा अतिरेक सुरू आहे. आजकाल सगळी कडे धार्मिक दहशतवाद वाढत आहे. पूर्ण भारतभर सर्व राजकारणी लोक नुसतं देव धर्म,दान धर्म ,मंदिर,मस्जिद, या नावाने प्रचंड प्रमाणात लोकांना भावनिक बनवून लुटलं जात आहे. जाती द्वेष निर्माण केला जात आहे. लोकांच्या कडून दान धर्म करवून घेऊन प्रचंड प्रमाणात पैसा, सोन चांदी लुटलं जात आहे. मंदिर, मूर्ती, कुंभमेळा यामध्ये करोडो रुपये वाया घातले जात आहे. जो पैसा लोकांच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा यासाठी वापरला पाहिजे तो धार्मिक विधी साठी वापरला जात आहे. त्यामुळे देशात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी, महागाई, अंधश्रद्धा वाढत आहे. (Maharashtra Day 2025)

पण लोक देव धर्म, मंदिर यामध्ये इतकं व्यस्त आहेत की त्याना त्याच्या मूलभूत गरजा काय आहे हेच विसरले आहेत. आणि गरिबी बेरोजगारी ,निराशा वाढत आहे. मग ते स्वामी, बाबा यांच्या मागे जात आहेत. विशेषतः महिला वर्ग जास्त प्रमाणात धार्मिक,अंधश्रद्धाळू बनत आहेत. प्रत्येक रस्त्याच्या बाजूला, चौकात मुद्दाम मंदिर उभे केले जाते आहे. असे मोठ्या प्रमाणात मंदिर बांधणे सुरू आहे. हे कमी झाले पाहिजे .एक गाव एक मंदिरच हवे आहे. त्यामुळे महिला वर्ग, नवीन पिढी फक्त देव धर्म, भित्रे ,लाचार बनत आहेत. देवाकडे जाऊन नेहमीच भीक मागण्याची प्रवृत्ती वाढत आहे. स्व कर्तृत्व, स्वतःच्या हिमतीवर ,फक्त अभ्यास करून पास होऊ हे विसरत आहेत, इतका धार्मिक बनवलं जात आहे.

त्यामुळे नवीन मंदिर बांधणे बंद झाले पाहिजे. एक विशिष्ट समाज जाणून बुजून सर्वसामान्य जनतेला स्वामी मंदिर पाप पुण्य यामध्ये अडकवून ठेवत आहे. त्याना भीती दाखवून ह्यामध्ये अडकवून लुटले जात आहे. ही समस्या देशात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. लोक चांगल्या शाळा, हॉस्पिटल, रस्ते,रोजगार, नद्यांचे शुद्धीकरण, प्रदूषण ,झाडे,जगलं कापले जात आहेत, ह्या बद्द्ल बोलत नाही; कारण राजकारणी लोकांनी त्याना देव ,हिंदू,मंदिर ,मुस्लिम द्वेश यामध्ये इतकं अडकवला आहे की ह्या गोष्टी कडे बघायला वेळ मिळत नाही. लोकांना निडणूक जिकण्या साठी मोफत खाद्य,पैसा, बस प्रवास दिले जात आहे. त्यामुळे लोक काम करून कमवून जगणे विसरले आहे. नंतर ह्या योजना बंद केल्या जातात निवडून आल्या वर, मग प्रचंड प्रमाणात निराशा, आळस,आत्महत्या वाढत आहे. त्यामुळे परत धार्मिक बनतात. लोकांना स्वावलंबी बनवून ,स्वतःच्या पायावर उभे करून, निडर,निर्व्यसनी, उच्च शिक्षित करून नोकऱ्या, रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. मंदिर,महाराज,स्वामी ,बाबा यांच्या कडून महिलांची फसवणूक, अब्रू लुटली जाते,महिलांना गुलाम बनवलं जात आहे. ह्यावर कडक कायदे हवेत.

कुणी मुलांना वैज्ञानिक दृष्टीकोन ने जगायला शिकवत नाही. स्वतःच्या हिमतीवर जगायला सांगत नाही. त्यांना स्वामी ,हिंदू,धर्म संस्कृती या नावाने अंध बववल जात आहे, हे भयंकर आहे. सोशल मीडियावर पण एकच समाजाचा वर्चस्व आहे. त्यामुळे नेहमीच स्वामी, साई देवाचे च सिरीयल प्रचंड प्रमाणात दाखवले जाते आहे. लोकांना हिप्नॉटाइज ,सारख तेच दाखवून देव भोळे बनवले जाते आहे. देश फक्त धर्मिकते कडे जात आहे. विकसनशील देश बनायला हवा. कुंभमेळा तील सगळ्या साधू संत बनलेल्या बेरोजगार लोकांना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी बनवावं.  करोडो रुपये कुंभमेळा वर उडवून साधूंना परावलबी बनवू नये. महिलांच शोषण केले जाते अश्या लोकांच्या कडून त्यावर कडक शिक्षा द्यावी.

मराठी भाषा महाराष्ट्र ची शान आहे. महाराष्ट्रात मराठी बोलली पाहिजे, शिकवली पाहिजे, मराठी भाषेचा ,शाळाचा दर्जा सुधारायला हवा. जस भारतीय परदेशात जातात तर अगोदर तिथली भाषा त्यांना कम्पलसरी शिकवली जाते. तसच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा परप्रांतीय येण्या अगोदर मराठी शिकवण गरजेचे केले पाहिजे. तरच आपल्या महाराष्ट्राला आपली भाषा ,आपले लोक जपता येईल. परप्रांतीय लोक प्रचंड प्रमाणात नोकरी करण्यासाठी येत आहेत. पहिलं महाराष्ट्रीन लोकांना नोकऱ्या मिळायला हव्यात नंतर परप्रांतीय. पण अस होत नाही. हे प्रथम व्हायला हवे. राजकारणी लोक स्वतःच्या पदांसाठी, मतलबा साठी जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही आणि त्यामुळे गरिबी, महागाई वाढत आहे. नोकऱ्या नाहीत, शिक्षणाचा दर्जा वाढायला हवा, शिक्षण मोफत करायला हवे.  महाराष्ट्रत शिक्षणाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात लुटले जात आहे. सर्वसामान्य जनतेला. खाजगीकरण प्रचंड होत जाते आहे. त्यामुळे मनमानी कारभार करत आहेत. प्रायव्हेट कंपन्या ,लोकांना फुकट तर सोडा ,कमी खर्चात पण काही करणं शक्य होत नाही. कर आकारणी प्रचंड प्रमाणात केली जाते आहे. टॅक्स भरपूर वसूल केला जातो; पण बदल्यात तितक्या सोयी, सुविधा दिल्या जात नाही. लोक बोलायला विसरले आहेत.

शेतकरी जगाचा पोशिंदा जाणता राजा. शेतकरी प्रचंड नुकसान सहन करत शेती करत आहे. त्याच्या पिकांना योग्य हमीभाव मिळायला हवा. भारताचा अन्नदाता शेतकरी सर्व सुख सोयी असलेला खऱ्या अर्थाने राजा बनायला हवा. शेतकरी लोकांच्या प्रत्येक घरातून 1 व्यक्ती सरकारी नोकरी करणारा असावा. असे शासनाने नियम ,रुल बनवावा.हॉस्पिटल, शाळा मोफत हवे ,नद्या स्वच्छ श्वास घेत वाहणाऱ्या असाव्यात, प्रदूषण मुक्त भारत हवा,झाडे,जगलं तोड सक्तीने बंद झाली पाहिजे.रस्ते ,बस खेडोपाडी चांगले हवेत.गावाचा विकास व्हायला हवा. राजकारणी लोक निवडून येण्यासाठी फक्त बोलतात पण करत नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम स्थान देऊन त्याची सगळ्या त मोठी पुतळा मुबंई मध्ये हवी. त्याची बदनामी करणाऱ्या लोकांना कडक शिक्षा व्हावी, जेणेकरून परत कुणी तसं करणार नाही. आणि त्याच्या विचाराचाच महाराष्ट्र हवा.पण त्याचा पण राजकारणी लोक वापर करून फसवणूक केली जाते आहे.

भारतात राजकारणी लोकांना देव धर्म ,पूजा पाठ मंदिर बांधणे यावर बंदी घातली पाहिजे. राजकारणी लोकांनी फक्त आणि फक्त जनतेच्या विकासाचा ,त्याच्या दैनंदिन गरजेचा विचार केला पाहिजे. खूप काही गोष्टी ,विषय आहेत राजकारण्यांना करण्यासाठी; पण ते फक्त पूजा पाठ करण्यात वेळ घालवत आहेत. रस्त्यावर मिरवणुका DJ मुक्त हव्या. व्यसन मुक्त हव्या. पारंपरिक पद्धतीने हव्या. त्यासाठी रस्त्यावरील वृक्षतोड करू नये राजकारणी लोकांनी. त्याबदल्यात हजार झाडे तरी लागवड करावीत. हे आणि असे खूप गोष्टी आहेत ज्या आपल्या भारतात व्हायला हव्या. भारत सुजलाम,सुफलाम देश बनावा. प्रत्येक भारतीय उच्च शिक्षित,सुशिक्षित, अंधश्रद्धा मुक्त,विकसित भारताचा नागरिक हवा. भारतात सर्वधर्म समभाव नांदावा. प्रगती व्हावी. असा असावा भारत देश.

 

  • अपर्णा शिखरे, इंटेरियर डिझायनर, लेखिका, समाजसेविका.
  • ————–

 

(विशेष टीप  – या लेखातील मते ही संबंधित लेखकाची वैयक्तिक मते आहेत. याच्याशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)