Dr Shashi Tharoor Pune Tour |नव्या भारतात लोकशाही धोक्यात :  डॉ. शशी थरूर

HomeBreaking Newsपुणे

Dr Shashi Tharoor Pune Tour |नव्या भारतात लोकशाही धोक्यात :  डॉ. शशी थरूर

गणेश मुळे May 06, 2024 1:56 PM

Murlidhar Mohol | बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड! | भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची घणाघाती टीका
Sharad Pawar in Congress Bhavan | दोन दशकानंतर शरद पवार काँग्रेस भवनात | काँग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही | शरद पवार
Pune congress | पुणे काँग्रेसच्या सुकाणू समिती बैठकीत एकमताने हा झाला निर्णय

Dr Shashi Tharoor Pune Tour | नव्या भारतात लोकशाही धोक्यात :  डॉ. शशी थरूर

|  धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन

 

Dr Shashi Tharoor Pune Tour – (The karbhari News Service) – आताचा भारत आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेला नाही. आपल्या देशातले या पूर्वीचे सरकार कोणाची पूजा करावीकाय खावेकाय घालावे हे सांगत नाही. मात्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारतामुळे जुन्या भारतातील सामाजिक एकोपामूल्य आणि इतर चांगल्या गोष्टी नष्ट होत आहेत. संविधानीक तरतूदी बदलल्या जात आहेत. यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली असून देशातील लोकांना ‘मोदींची गॅरंटी’ नव्हे तर ‘लोकशाहीची गॅरंटी’ हवी आहेअशी टीका काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. शशी थरूर यांनी सोमवारी पुण्यात केली.

 

पुणे लोकसभा मतदार संघाचे  महाविकास आघाडीइंडीया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन सोमवारी काँग्रेस भवनमध्ये डॉ. शशी थरुर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ‘ निरोगी, आनंदी, सुरक्षित पुण्यासाठी – माझा शब्द.’ असे जहर नामयाचे वैशिष्ट्य पूर्ण नाव ठाव्न्यात आले आहे. याप्रसंगी धंगेकर यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुखमाजी राज्यमंत्री रमेश बागवेमाजी आमदार उल्हास पवारप्रचार प्रमुख मोहन जोशी, अ. भा. काँग्रेस कमिटीचे प्रभारी आशिष दुआ, अभय छाजेड, अंकुश काकडे, गजानन थरकुडे, गोपाळ तिवारी, राज अंबिके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

डॉ. थरूर म्हणालेसरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे जनतेच्या मनात सत्ताधारी भाजप विरोधात रोष आहे. त्यामुळे चारशे पार तर सोडाच 300 सुद्धा पार होणार नाही. काँग्रेसने 60 वर्षात जनतेचे काहीही हिसकावून घेतले नाही. अनेक उद्योगांनी त्यांचे मुख्य कार्यालय परदेशातील दुबई सारख्या शहरात हलवले आहे. यंत्रणांचा वापर करून दबाव टाकला जातो. कर चुकवणारे देशभक्त होतात आणि सर्वसामान्य अँटी नॅशनल होतात.

 

मोदींनी 345 वर्षापूर्वीच्या औरंगजेबावर बोलण्यापेक्षा गेल्या 10 वर्षात काय काम केले यावर बोलावे. काँग्रेसच्या न्याय पत्रामध्ये कुठेही मुस्लिम धर्माचा उल्लेख नाहीअसे असताना नरेंद्र मोदी व भाजप नेते कोणत्या आधारावर बोलतात कळत नाही. निवडणूक रोख्यांबाबत मोदी सरकार माहिती दंडवत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोदी सरकार उघडे पडले. त्यांनी निवडणूक रोख्यांतून स्वतः खाल्ले आणि इतरांना खऊ घातल्याची टीका डॉ. थरुर यांनी केली.

 

वायनाडमधून राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. तसेच उत्तर प्रदेशात काँग्रेसला आम्ही तुमच्याबरोबर आहोत हा संदेश द्यायचा आहे. रायबरेली लोकसभा 1959 पासून काँग्रेस लढवत आहे. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यामुळे काँग्रेसने ही जागा लढवणे आवश्यक होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी जनतेसोबत असल्याचे दाखवत रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. पंतप्रधान पदाबाबत थरुर म्हणालेनिवडणुकीनंतर इंडीया आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षात एकोपा असून आघाडीच्या जागा महाराष्ट्रात वाढतीलआसा विश्वासही डॉ. थरुर यांनी व्यक्त केला.

 

धंगेकर म्हणालेकी सार्वजनिक वाहतूकज्येष्ठ नागरिकआरोग्यशिक्षणपर्यावरणसांस्कृतिक आणि पर्यटनश्रमिक आणि असंघटित कामकार या घटकांचा जाहीरनाम्यात समावेश आहे.

 

—————————-

करकरेंच्या मुत्यूची चौकशी झाली पाहिजे ः

शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झालेला नाहीअसे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर थरूर म्हणालेयामध्ये नेमके तथ्य काय आहेहे मला माहीत नाही. माजी पोलिस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकात तसा उल्लेख आला आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण आहे. करकरे आणि माझे चांगले संबंध होते. त्यामुळे या प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी झाली पाहिजे. जे काय खरे आहेते समोर आले पाहिजेअसेही डॉ. थरूर म्हणाले.