Buldhana Bus Accident | Samruddhi Mahamarg | पाच लाख देऊन प्रश्न सुटणार नाही | शरद पवार

HomeBreaking Newsपुणे

Buldhana Bus Accident | Samruddhi Mahamarg | पाच लाख देऊन प्रश्न सुटणार नाही | शरद पवार

Ganesh Kumar Mule Jul 01, 2023 12:55 PM

Indefinite Strike | Old pension | संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार
Municipal Election of Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
Movement Against Biological Invasion | उपद्रवी फिरंगी तणांबाबत शासकीय धोरण ठरावे | मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) ची मागणी

Buldhana Bus Accident | Samruddhi Mahamarg | पाच लाख देऊन प्रश्न सुटणार नाही | शरद पवार

Buldhana Bus Accident | Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच – सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाहीत. जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी…संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी… कुठे चूक झालेली आहे… कशामुळे चूक झाली आहे…ती शोधून काढावी आणि याप्रकारे लोक जात आहेत ती स्थिती आणि याप्रकारचे वाढते अपघात आहेत ती स्थिती थांबवण्यास हातभार लावावा. पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे. अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.
आज पुणे येथील एका कार्यक्रमानंतर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) झालेल्या भीषण अपघाताबाबत पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले ही गोष्ट खरी आहे परंतु दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत आहेत. हे गेले काही महिने बघायला मिळते आहे. मध्यंतरी या महामार्गावरुन जात असताना काही लोकांनी याबाबत त्यांचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्या लोकांनी या महामार्गाची महाराष्ट्रात फार मोठी चर्चा झाली, फार उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने एखाद दुसरा अपघात पहायला मिळत आहेत. त्याचे कारण कदाचित याचे सायंटिफिक  नियोजन केले नसावे त्याचा दुष्परिणाम लोक मृत्युमुखी पडत आहेत. (Buldhana Bus Accident)
हा महामार्ग तयार करण्याच्या कालावधीत, निर्णय घेण्यात, त्याचे नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत – नकळत दोषी ठरवतात. काय झाले असेल ते झाले असेल पण जी दुर्घटना घडली ती दु:खद आहे. (Samruddhi Highway)
पवार पुढे म्हणाले, माझं वैयक्तिक मत आहे. आपण प्रवास करताना डोक्यात काही खुणा असतात, काही वळणे दिसतात, झाडे दिसतात परंतु या प्रवासात रस्त्याची सलगता आहे आणि आजुबाजुला कुठे काही नाही. अनेक ठिकाणी या गोष्टीचा परिणाम वाहन चालवतो त्यांच्यावर होतो का अशी शंका काही लोकांनी बोलून दाखवली आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण यातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुठे दुरुस्ती करायची शक्यता असेल तर ती केली पाहिजे. (Buldhana Bus Accident Update)
एमएसआरडीसीने त्यांच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दुसर्‍यावर ढकलायचा प्रयत्न केला आहे. माझे मते या देशातील इंडियन रोड काँग्रेसने यांची पाहणी केली असे तुम्ही म्हणत असाल आणि जर हे खरे असेल तर जगातील जे चांगले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवावे. त्यांची एक कमिटी करावी. त्यामार्फत चौकशी करावी, त्यांचे रिकमेंडेशन घ्यावे आणि करेक्शन मेजर द्यावीत असा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावी कारण लोकांचे प्राण हे महत्वाचे आहेत. असे ही पवार यांनी सांगितले.
 News Title | Buldhana Bus Accident |  Samruddhi Mahamarg |  Paying five lakhs will not solve the problem  Sharad Pawar