Aba Bagul | मनस्वी आनंद….गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा

HomeपुणेBreaking News

Aba Bagul | मनस्वी आनंद….गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा

Ganesh Kumar Mule Jun 09, 2022 4:57 PM

Parvati Assembly Constituency | ‘पर्वती’चा १५ वर्षात खुंटलेला विकास ५ वर्षात पूर्ण करणार: आबा बागुल
1971 War : Aba Bagul : पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी चित्रफितीचे लोकार्पण गुरुवारी  : कॉंग्रेस गटनेते आबा बागुल यांची संकल्पना 
City President | Pune Congress | कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?

मनस्वी आनंद….गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा

माजी उपमहापौर व काँग्रेस पक्षाचे मा. गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून देशात प्रथमच साकारलेल्या आणि रोल मॉडेल ठरलेल्या पुणे महानगरपालिकेच्या   राजीव गांधी  अकॅडमी ऑफ   ई- लर्निंग स्कुलचे   विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहेत आणि विविध क्षेत्रात यशस्वी  पदार्पण करत आहेत.

आनंदाची आणि अभिमानास्पद  बाब अशी की, पुणे महानगरपालिका संचलित राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ-लर्निग स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पुणे या कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष एप्रिल/मे 2022 चा इयत्ता बारावीचा निकाल 97.49टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा एकूण 403 विद्यार्थी परीक्षेस बसले होते .त्यापैकी 389 विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून यंदा निकाल ९७.४९टक्के लागला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आबा बागुल यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील करिअरसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्गाचेही आबा बागुल यांनी आभार व्यक्त करून गुणवत्तेची ही उत्तुंग भरारी सदैव असू द्या अशा शुभेच्छाही दिल्या.

विशेष म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अल्पावधीत ख्याती निर्माण करणाऱ्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमधील विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.२०१७च्या बॅचमधील नितिशा संजय जगताप ही  आज ‘आयपीएस अधिकारी ‘ झाली आहे. नितिशाची बहीण तनिशा जगताप ही सुद्धा  २०१५च्या बॅचमधून घवघवीत यश संपादन करून आज इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे.  राजीव गांधी  अकॅडमी ऑफ   ई- लर्निंग स्कुलने दहावी -बारावी आणि अन्य परीक्षांच्या   निकालांमध्ये सातत्याने शंभर टक्क्यांची परंपरा कायम राखली आहे. आयआयटीमध्ये ५०० विद्यार्थी तर जेईईमध्ये १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. इतकेच नाहीतर ‘नासा’साठी दोन विद्यार्थीही पात्र ठरले आहेत .खऱ्या अर्थाने हा गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा जल्लोष आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0