Home Minister VS MNS : पोलीस तयार आहेत : गृहमंत्र्यांचा मनसेला इशारा 

HomeBreaking NewsPolitical

Home Minister VS MNS : पोलीस तयार आहेत : गृहमंत्र्यांचा मनसेला इशारा 

Ganesh Kumar Mule Apr 14, 2022 3:49 PM

Sugarcane Crushing Season | राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
Prisoners loan Scheme : ‘जिव्हाळा’ कर्ज योजनेतून आपलेपणाची भावना वाढीस लागेल : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
Dilip walse patil : सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

पोलीस तयार आहेत : गृहमंत्र्यांचा मनसेला इशारा

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी एकामागून एक दोन सभा घेतल्याने राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. यातच राज ठाकरेला यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवरून ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करत ३ मेपर्यंत ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी भाष्य करत मनसेला थेट इशारा दिला आहे. राज्यातील परिस्थिती बिघडू देणार नाही. पोलीस तयार आहेत, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत केलेला दावा खोडून काढला असून, मशिदींवरील भोंग्यांना विरोध करताना ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो, त्यामध्ये रात्री १० ते सकाळी ६ या काळात कोणत्याही ठिकाणी लाऊडस्पीकर्स वाजवू नयेत, असे म्हटले आहे. ज्याठिकाणी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत, ते काढण्याचा प्रश्नच येत नाही, असे दिलीप-वळसे पाटील यांनी नमूद केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोणत्याही परिस्थितीत राज्यात वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करून देणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे लोक आहोत. आमच्यासाठी सर्वजण सारखे आहेत. पोलीस सज्ज असल्यामुळे कोणताही तणावाची परिस्थिती उद्भवणार नाही, असा विश्वास दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलासाबाबत बोलताना, विशिष्ट पक्षाच्या लोकांना दिलासा मिळत असेल तर आश्चर्य वाटणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. त्यामध्ये चुकीचे काहीही नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, अखंड भारताच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाला संजय राऊत यांनी दिलेल्या समर्थनाबाबत विचारले असता, भारत हा वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांनी मिळून बनलेला देश आहे. त्याच्या विघटनाचा प्रयत्न करू नये. तसेच अखंड भारताबाबत संजय राऊत यांची नेमकी आणि सविस्तर भूमिका काय आहे, हे मी त्यांना भेटल्यावर विचारेन, अशी प्रतिक्रिया दिलीप-वळसे पाटील यांनी दिली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1