ATMS | तंत्रज्ञान आणि वाहतुकीचा मिलाफाने पुणेकर सुखावले! |  शहरातील १२५ प्रमुख चौकांमध्ये अत्याधुनिक ॲडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) यशस्वीरित्या कार्यान्वित | वाहतूक कोंडीत घट!

Homeadministrative

ATMS | तंत्रज्ञान आणि वाहतुकीचा मिलाफाने पुणेकर सुखावले! | शहरातील १२५ प्रमुख चौकांमध्ये अत्याधुनिक ॲडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) यशस्वीरित्या कार्यान्वित | वाहतूक कोंडीत घट!

Ganesh Kumar Mule Jul 25, 2025 12:00 PM

PMC 75th Anniversary Special | पुणे महापालिका पुणेकरांना उपलब्ध करून देणार विषमुक्त भाजीपाला आणि फळे!
PMC election department has asked all departments for information on ongoing development works!
Naval Kishore Ram IAS | शहराच्या हितासाठी नियमांचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही | महापालिका आयुक्त नवल किशोर राम

ATMS | तंत्रज्ञान आणि वाहतुकीचा मिलाफाने पुणेकर सुखावले!: अत्याधुनिक ॲडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममुळे (ATMS) वाहतूक कोंडीत घट!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहराने शहरी वाहतूक व्यवस्थापनात एक ऐतिहासिक झेप घेतली आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (PSCDCL), पुणे वाहतूक पोलीस आणि पुणे महानगरपालिका (PMC) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील १२५ प्रमुख चौकांमध्ये अत्याधुनिक ॲडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचला आहे, ज्यामुळे लाखो पुणेकरांना दररोज मोठा दिलासा मिळत आहे. (Pune Smart City – PMC Pune)

*ATMS प्रणालीचे फायदे:*

प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडीत १० ते १५% घट.

प्रवासाच्या वेळेत सरासरी १५% ची सुधारणा.

वाहनांच्या सरासरी वेगात १२% वाढ.

प्रमुख मार्गांवर ७०% वाहनांना न थांबता ग्रीन सिग्नल (Arrival on Green), ज्यामुळे इंधनाची बचत होते.

 

*रिअल-टाइम डेटावर आधारित बुद्धिमान वाहतूक नियंत्रण*

ATMS प्रणाली ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित असून, ती रस्त्यांवरील वाहनांची प्रत्यक्ष गर्दी ओळखून सिग्नलच्या वेळा आपोआप बदलते. यासाठी एआय-सक्षम कॅमेरे, वाहतूक सेन्सर्स आणि सेंट्रलाइज्ड कंट्रोलर्सचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान चौकातील वाहनांची संख्या, वाहतुकीचा वेग आणि कॉरिडॉरमधील गर्दीचे विश्लेषण करून ग्रीन सिग्नलची वेळ अचूकपणे ठरवते. यामुळे अनावश्यक थांबणे टाळले जाते आणि वाहतूक अधिक सुरळीतपणे पुढे जाते.

या प्रणालीमध्ये खालील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे:

एआय-सक्षम वाहन डिटेक्शन कॅमेरे: वाहनांची अचूक संख्या आणि प्रकार ओळखता येतात.

जंक्शन कंट्रोलर्स: रिअल-टाइममध्ये सिग्नल नियंत्रित करता येतात.

ब्लूटोड (BlueTOAD) डिव्हाइसेस: प्रवासाचा वेळ आणि वेग मोजता येतो.

व्हेरिएबल मेसेज साइनबोर्ड (VMS): वाहनचालकांना वाहतुकीची थेट माहिती दिली जाते.

हे सर्व घटक वाहतूक कमांड आणि कंट्रोल सेंटरशी (TCCC) जोडलेले असून, तेथून संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले जाते.

*शहरी नियोजनासाठी एक भक्कम पाया*

ATMS मुळे केवळ दैनंदिन वाहतूक सुरळीत झाली नाही, तर भविष्यातील शहरी नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध होत आहे. या डेटाच्या आधारे वाहतुकीचे नवीन नियम बनवणे, रस्त्यांची सुधारणा करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत वाहतुकीचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

पुण्याचा हा उपक्रम भारतातील इतर शहरांसाठी एक आदर्श मॉडेल ठरत आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांचे जीवनमान कसे सुधारता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. दरम्यान हे टिकवण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी अशा दोन्ही संस्थात समन्वय साधावा लागणार आहे. यासाठी प्रशासनाने पाऊल उचलणे अपेक्षित आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: