State Commission for Women | महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३० वा वर्धापन दिन

HomeBreaking Newssocial

State Commission for Women | महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३० वा वर्धापन दिन

Ganesh Kumar Mule Jan 24, 2023 2:12 PM

Good Governance Rules |  Maharashtra | देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता
Disaster Management | CM Eknath Shinde | आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश
Jejuri | Supriya Sule | जेजुरी स्थानक अद्ययावत करा | खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र

महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३० वा वर्धापन दिन

|मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्री यांच्या हस्ते महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव

| महिला आयोग – फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ

| महाराष्ट्रात पहिल्यांदाच फेसबुकची शासकीय यंत्रणेसोबत जनजागृती मोहिम

मुंबई | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे होणार आहे.

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्य महिला आयोगाच्या अध्य़क्षा रुपाली चाकणकर, सदस्या अँड गौरी छाब्रिया, अँड संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, आभा पांडे, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमात राजकारण, समाजकार्य, प्रशासन क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या खटल्यात संवेदनशीलतेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, विधवा प्रथा बंदीचा ठराव करत ऐतिहासिक पाउल उचलणारी हेरवाड ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोग आणि फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षिततेकरिता राबविण्यात येणार्या ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ यावेळी होणार आहे. पुढील एक वर्ष हे अभियान राबविण्यात येणार असून यात महिलांमध्ये इंटरनेट, सायबरच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. फेसबुक महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे शासकीय यंत्रणेशी करार करत जनगागृतीपर मोहीम हाती घेत आहे. आयोगाकडे गेल्या काही वर्षात वाढलेल्या आँनलाईन फसवणूक, सायबर गुन्हे अशा तक्रारी पाहता भविष्यात महिलांना सायबर साक्षर करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

तसेच राज्य महिला आय़ोग आणि इंटरनँशनल जस्टीस मिशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डिंग ब्रिज – वल्नरेबल कम्युनिटीज अन्ड क्रिमीनल जस्टीस सिस्टिम या टुलकिट पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. सर्वसामान्य नागरिक जागरुक असतील तर अनेक गुन्ह्यांना आळा घालता येतो. त्यासाठी लोकांचा यंत्रणांवरील विश्वास दृढ होणे गरजेचे आहे. समाज आणि पोलिस, शासन, न्याययंत्रणा यांच्यातला समन्वय वाढण्याच्या उद्देशाने आय़ोगाने प्रथमच अस टुलकिट केले आहे.