PMC | salaried employees | पुणे महापालिकेतील रोजंदारी तत्त्वावरील 277 कर्मचारी होणार कायम 

HomeपुणेBreaking News

PMC | salaried employees | पुणे महापालिकेतील रोजंदारी तत्त्वावरील 277 कर्मचारी होणार कायम 

Ganesh Kumar Mule May 20, 2022 1:14 PM

PMPML | पीएमपीएमएलची सेवा भविष्यात खंडित होऊ न देण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
Pune | Property Tax Hike | पुणेकरांना मिळणार दिलासा!  मिळकतकरात वाढ होणार नाही?
Illegal Hoardings | आरक्षित जागेवर अनधिकृत होर्डिंग्स | प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जनआंदोलन

पुणे महापालिकेतील रोजंदारी तत्त्वावरील 277 कर्मचारी होणार कायम

: महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे : महापालिकेत पूर्वीपासून रोजंदारी तत्वावर सलग 5 वर्ष काम करणाऱ्या 277 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येणार आहे. तसेच त्यांना सर्व लाभ देखील देण्यात येणार आहे. नुकताच महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पुणे महानगरपालिकेत सन १९९४ पासून रोजंदारी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी पुणे महानगरपालिका  कामगार युनियन यांचेतर्फे औद्योगिक न्यायालयात  दावा दाखल करून त्यांना कायम करणेबाबतच मागणी केली होती. औद्योगिक न्यायालयाने  निर्णय दिला होता.

या  निर्णयाविरुद्ध पुणे मनपा प्रशासनाने  याचिका दाखल केली होती. त्याबाबत उच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती न दिल्याने प्रशासनाने में सर्वोच्च न्यायालयात Special leave toAppeal(Civil)CC/13924/2013 दाखल केले होते. त्याबाबत  सर्वोच्च न्यायालयाने दि. १६/८/२०१३ रोजी दिलेल्य आदेशानुसार सदरचा दावा उच्च न्यायालयापुढे पुन्हा निर्णयासाठी दाखल केला. दरम्यानचे कालावधीत तक्रारदारांपैकी काही कर्मचारी हे सतत गैरहजर, मयत, वयोपरत्वे सेवानिवृत्त व काही जण सरळसेवा भरतीने
महानगरपालिकेच्या अन्य विभागात नेमणूकीस आहेत. त्यामुळे तत्कालीन वेळी मे. उच्च न्यायालयांच्या अंतरिम  निर्देशांनुसार उर्वरित कर्मचाऱ्यांना दि.२९/११/१३ रोजी (आज्ञापत्र जा.क्र.नअसे/ २३३३, २३३४ व २३३५) बिगारी
झाडूवाला, कचरा मोटार बिगारी, जे.सी.बी.ऑपरेटर, मोटार सारथी या तत्सम पदावर तात्पुरत्या नेमणूका देण्या आल्या आहेत. तात्पुरत्या नेमणुकांचे स्वरूप बदलून संबंधितांना रोजंदारीतील ५ वर्षेच्या सलग सेवेनंतर कायम करणेस
त्याअनुषंगाने तदर्थ लाभ देणेची विनंती संबंधितांनी Interim Application देऊन उच्च न्यायालयापुढे केली होती याबाबत हा निर्णय घेणेत येत आहे. त्यानुसार सलग 5 वर्ष काम करणाऱ्या 277 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येणार आहे. तसेच त्यांना सर्व लाभ देखील देण्यात येणार आहे.