BJP Maharashtra Mahila Morcha | भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

HomeपुणेBreaking News

BJP Maharashtra Mahila Morcha | भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

Ganesh Kumar Mule Feb 03, 2023 3:30 PM

Archana Patil | स्पायडरमशिन टेंडर प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा  | माजी नगरसेविका अर्चना पाटील यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 
Hawker’s: शहरातील छोट्या व्यावसायिकांना दिलासा! : दिवाळीच्या सणात कडक कारवाई नाही
Pune Potholes | BJP Women Wing | पुणे शहरातील खड्ड्यावरून भाजप महिला आघाडी आक्रमक | महापालिका भवना समोर केले आंदोलन

भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक आज शिवाजी नगर, सेंट्रल पार्क हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी महिला मोर्चाच्या महिला भगिनींच्या अनेक प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे मिळाली. तसेच यावेळी माझा अर्चना तुषार पाटील पासून ते सगळ्यांची हक्काची अर्चना ताई बनण्यापर्यंतचा ३ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित प्रवास अहवाल प्रकाशनातून सादर करण्यात आला. अशी माहिती पुणे महिला मोर्च्याच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली.

यावेळी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधरआण्णा मोहोळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माझे मार्गदर्शक खासदार संजय नाना काकडे, तसेच पुण्याचे विद्यमान, सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार मेधा कुलकर्णी तसेच इतर महिला मैत्रिणी, आणि मान्यवर उपस्थित होते.

येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये संघटनेला बळकटी आणण्यासाठी महिला मोर्चा कशाप्रकारे काम करणार आहे हा आजच्या पहिल्या महिला मोर्चा कार्यकारिणी बैठकीचा मुख्य हेतू होता.
यावेळी महिलांना प्रोत्साहन देताना चित्राताई म्हणाल्या, येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश हा देशातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट असा महिला मोर्चा असेल.
या बैठकीतून अनेक महिलांनी त्यांची मते मांडली. प्रश्न समोर ठेवले आणि त्यातून त्यांना अनेक धुरंधर राजकीय नेत्यांकडून योग्य दिशादर्शक मार्गदर्शन, सल्ले आणि सहकार्य लाभले. असे पाटील यांनी सांगितले.