Jumbo Covid Center : Mahavikas Aghadi : Thackrey Govt : पुण्याच्या जम्बो सेंटर वरून देखील ठाकरे सरकार ‘टार्गेट’! 

HomeपुणेPolitical

Jumbo Covid Center : Mahavikas Aghadi : Thackrey Govt : पुण्याच्या जम्बो सेंटर वरून देखील ठाकरे सरकार ‘टार्गेट’! 

Ganesh Kumar Mule Feb 10, 2022 5:06 PM

Jumbo Covid Center : जम्बो कोविड सेंटर बाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने केला ‘हा’ खुलासा
Kirit Somaiya : सोमय्या हे व्हीलचेअरवरून थेट पुणे महापालिकेत! : जम्बो कोविड सेंटर ची केली तक्रार
Jumbo Covid Centre : २८ फेब्रुवारीनंतर जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय

पुण्याच्या जम्बो सेंटर वरून देखील ठाकरे सरकार ‘टार्गेट’!

: येनकेन प्रकारेण कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

पुणे : केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप अर्थात विरोधी पक्ष ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. महाविकास आघाडीतील महत्वाचे मोहरे या त्रासाला कंटाळले आहेत. नुकतीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेत भेट दिली. त्यांच्या भेटीवरून देखील ठाकरे सरकारला टार्गेट करण्याचे काम केंद्र सरकार करते आहे, हे आता उघड होत आहे.

: महाराष्ट्र बाबत आकस वाढला

किरीट सोमय्या हे जम्बो कोविड सेंटर ची तक्रार करण्यासाठी महापालिकेत आले होते. ते ही सुट्टीच्या दिवशी. गम्मत म्हणजे हे सेंटर चालवले जाते PMRDA कडून. महापालिकेचा त्याचा फक्त डॅशबोर्ड शी संबंध आहे. सगळी प्रक्रिया PMRDA कडून राबवली जाते. तरीही सोमय्या महापालिकेत तक्रार देण्यासाठी आले. शिवसैनिकांशी धक्काबुक्की झाल्यानंतर सोमय्या हॉस्पिटल मध्ये गेले. हॉस्पिटल मधून नंतर महापालिकेत व्हीलचेअर वर आले. सुरक्षा रक्षकांना निवेदन देताना मात्र उभा राहून फोटो काढला. संजय राऊत यांना टार्गेट करण्यासाठी सोमय्या या प्रकरणाच्या मागे लागले आहेत. त्यात कहर म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी केंद्राने एक पथक देखील पुण्यात पाठवले आहे.  यातून सिद्ध एकच होते कि यामागे जनतेची काळजी नसून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आहे.
आतापर्यंत फक्त राज्यातील विरोधी नेतेच महाविकास आघाडी सरकारविषयी आकस दाखवण्याचे काम करत होते. मात्र परवाच्या संसदेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणावरून देखील हेच दिसून आले. शिवाय केंद्र सरकारने राज्यातील मंत्री आणि मोठ्या नेत्यांच्या मागे केंद्रीय एजेंसीचा ससेमिरा मागे लावून ठेवला आहेच.
महापालिका निवडणूका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत ठाकरे सरकार आणि त्यांचे मंत्री याचा सामना कसा करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.