Ind vs Pak : पुण्याच्या रस्त्यांवर सामसूम

HomeपुणेSport

Ind vs Pak : पुण्याच्या रस्त्यांवर सामसूम

Ganesh Kumar Mule Oct 24, 2021 4:59 PM

Walchandnagar Industries and VCB Electronics | वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान | खासदार  सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेत दोन्ही कंपन्यांचा गौरव
Social Security | Ganesh Mandal pune| सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन
PMC Employees Union | वैद्यकीय योजना मोडीत काढणारा स्थायी समितीचा ठराव रद्द करा  | कामगार मेळाव्यात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिकेत 

पुण्याच्या रस्त्यांवर सामसूम!

: भारत पाकिस्तान सामन्याचा असर

पुणे: पुणे शहरात एरवी रात्री 11 वाजेपर्यंत वर्दळ पाहायला मिळते. मात्र रविवारी रात्री मात्र 7:30 वाजलेपासूनच महत्वाच्या रस्त्यांवर देखील सामसूम पाहायला मिळाली. याचे कारण आहे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान खेळला जाणारा t20 क्रिकेट सामना. अशी स्थिती पुण्यात जेव्हा लॉकडाऊन लागू झाला होता तेंव्हा पाहायला मिळाली होती.

: सगळे सामना पाहण्यात दंग

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पूर्ण जगाच्या उत्सुकतेचा विषय असतो. कारण या दोन्ही टीम पारंपारीक स्पर्धक म्हणून ओळखल्या जातात. भारताने पाकिस्तान विरोधात 2007 साली मोठा विजय मिळवत 20-20 चा विश्व चषक मिळवला होता. भारत सहजासहजी पाकिस्तान विरुद्धची मॅच हातात नाही. फक्त क्रिकेट प्रेमी नाही तर मॅच ची आवड नसणारे देखील ही मॅच मोठ्या चवीने पाहत असतात. 2021 च्या t 20 च्या विश्व चषकातील आजचा हा पहिलाच सामना आणि तो हि पाकिस्तान सोबत. त्यात आज रविवार. त्यामुळे पुणेकर नागरिक देखील 11 वाजेपर्यंत वर्दळ करणारे आज मात्र 7:30 पासूनच आपापल्या घरात सामना पाहण्यात दंग झाले होते. त्यामुळे रस्त्यावर सामसूम दिसून आली.
भारताने या सामन्यात 151 धावा जमा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली च्या खेळाचे खूप कौतुक होताना दिसून येत आहे. पाकिस्तान च्या 11 ओव्हर पूर्ण झाल्या तेंव्हा 80 धावा झाल्या होत्या. सर्वाना उत्सुकता कोण आणि कसे जिंकणार याचीच आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0