PMC Solid Waste Management | पालखी कालावधीत घनकचरा विभागाने संकलित केला २५७ टन कचरा | विशेष स्वच्छता मोहीम घेऊन शहर केले स्वच्छ
Palkhi Sohala 2025 – (The Karbhari News Service) – संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज आषाढी पालखी कालावधीमध्ये महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून दैनंदिन स्वरुपात शहरात स्वच्छता विषयक कामे करण्यात आली असून १५ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण २५७.३०८ टन कचरा संकिलत करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर पालखीचा मुक्काम असलेल्या सर्व शाळा, धर्मशाळा, मंदिरे या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली आणि शहरात स्वच्छता ठेवण्यात आली. अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Sandip Kadam PMC)
सालाबाद प्रमाणे श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पालखी सोहळा, पुणे शहर मार्गे पंढरपूर येथे मार्गस्थ होत आहे. यादरम्यान दोन्ही पालख्यांचा २०/०६/२०२५ ते २२/०६/२०२५ या कालावधीमध्ये पुणे शहरात मुक्काम असणार आहे. २० जून रोजी पालखीचे पुणे शहरात आगमन झाले. २० व २१ जून रोजीच्या मुक्कामादरम्यान पुणे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्याचे झाडणकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आले. संपूर्ण शहरात दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात आले.
क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण पालखी मार्गावर प्रत्येकी ५० मी. अंतरावर कचरा संकलनकरिता बकेटची व्यवस्था करण्यात आली. सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत पालखी कालावधीमध्ये ८० लिटर क्षमतेचे एकूण ६८५ बकेट व ३१ तात्पुर्त्या कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले.
पुणे शहरात येणा-या वारक-यांच्या सोयीसाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या मागणीनुसार १९ ते २९१ अखेर १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार व आवश्यकतेनुसार पोर्टेबल व फिरते शौचालय पुरविण्यात आले. तसेच सदरच्या शौचालयांची मनपा सेवकांमार्फत व सबंधित यंत्रानेद्वारे दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात आली. २०/०६/२०२५ आणि २१ रोजी प्रत्येकी १६०८ पोर्टेबल शौचालयांची सोय वारक-यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.
सार्वजनिक रस्त्यावर, वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रिय कार्यालयांमार्फत आवश्यकतेनुसार सार्वजनिक ठिकाणी कीटकनाशक, दुर्गंधीनाशक औषध फवारणी करण्यात आली. याकरीता घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडून ६७५० किलो जंतुनाशक पावडर व १००० लिटर जंतुनाशक लिक्विड पुरविण्यात आले.
पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी जेटिंग मशीनद्वारे सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली.
भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दोनही पालखी मुक्कामास असल्यामुळे व तेथे वारक-यांची संख्या जास्त असल्यामुळे भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात साफ सफाईचे व स्वच्छतेची कामे होणे करीता कामे होणे करीता अन्य क्षेत्रिय कार्यालयाकडून अन्य क्षेत्रिय कार्यालयाकडून १९ ते २१ पर्यंत ६० अतिरिक्त सेवकांची नेमणूक करण्यात आली.
वारकरी मुक्कामास असलेल्या शाळांमध्ये तीन पाळ्यांमध्ये महिला वारक-यांसाठी शौचालय व न्हाणी घराची सोय करण्यात आली.
पालखी कालावधीमध्ये पुणे महानगरपालिका व पॅटकेअर संस्थेमार्फत महिलांकरीता एकूण ४५००० सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध करून त्याचे वाटप करण्यात आले.
• स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुद्दामाच्या ठिकाणी / मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्यात आले.
८२४० सफाई कर्मचारी पालखी कालावधीमध्ये शहरातील स्वच्छतेसाठी कार्यरत होते.
21 जून 2025 रोजी जागतिक योग दिनानिमित्त वारकऱ्यांसाठी शह्रातील ५०० विविध शाळा महाविद्यालयांमध्ये योग कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या सर्व शाळांमध्ये महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता विषयक कामकाज करण्यात आले.
२२ रोजी पालखी मार्गस्थ झाल्यानंतर मुक्काम असलेल्या सर्व शाळा, धर्मशाळा, मंदिरे व पालखी मार्ग या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पत्नीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू / आळंदी / पंढरपूर येथे दाखल होत असतात. वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. या अनुषंगाने मागील तीन वर्षांपासून ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून आरोग्यवारीच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यानुसार स्थानिक प्रशासन व पोलीस यांच्या मदतीने सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत .
या आरोग्य वारीमध्ये पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
१) वारी काळात दर दहा ते वीस कि. मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करण्यात आली.
२) मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून देऊन ४५००० सॅनिटरी नॅपकीन्सचे वाटप करण्यात आले.
३) स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
४) महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुद्दामाच्या ठिकाणी / मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्यात आले.
५) पालखी कालावधीमध्ये स्वच्छते संबंधित पाहणी करण्यासाठी व तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक मुकादम व सफाई सेवक यांची QRT टीम तयार करण्यात आली.
श्री. संत तुकाराम महाराज व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी निमित्त १९ जून २०२५ रोजी निवडुंग्या विठोबा मंदिर या ठिकाणी आरोग्य वारीच्या उद्घाटनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुक्कामाच्या निवडुंग्या विठोबा मंदिर व पालखी विठोबा मंदिर या ठिकाणी महिला वारकऱ्यांसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर वारकऱ्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आलेल्या शहरातील विविध शाळांमध्ये देखील महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात आले. याठिकाणी महिला कक्ष स्थापन करण्यात आला असून महिला स्त्री रोगतज्ञ व औषध सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली. त्याचप्रमाणे महिला सुरक्षा व आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली. या आरोग्य वारीमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असून यामध्ये महिलांना आरोग्य व सुरक्षा विषयक सोयीसुविधा पुरविण्यात आल्या.
आरोग्य वारीच्या कार्यक्रमासाठी . चंद्रकांत पाटील मंत्री उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, पुणे महानगर परिवह्न महामंडळाच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दिपा मुधोळ – मुंडे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदिप कदम, मा. सभासद, विशाल धनवडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS