Maharashtra Vidhansabha Election | २३ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रात परिवर्तन दिवस !- मोहन जोशी
Mohan Joshi Pune Congress – (The Karbhari News Service) – महाराष्ट्रात गेली अडीच वर्षे घटनाबाह्य युती सरकार अस्तित्वात होते. भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे हे घटनाबाह्य सरकार जनहितासाठी सत्तेवरून दूर करण्यासाठी महाविकास आघाडीने न्यायालयात दाद मागितली दुर्दैवाने तब्बल अडीच वर्ष प्रयत्न करूनही न्यायालयाकडून न्याय मिळाला नाही. आता मात्र २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेच्या न्यायालयात न्याय मिळेल आणि महायुतीचा पूर्ण पराभव होईल हा विश्वास आहे. त्यामुळेच मतमोजणीचा २३ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रात ‘परिवर्तन दिन’ म्हणून साजरा होईल. असा विश्वास महाविकासआघाडीतर्फे आम्ही व्यक्त करतो. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.
COMMENTS