Prashant Jagtap Vs BJP : सूर्यास्त होईपर्यंत स्थायी ची बैठक चालवली म्हणजे भाजपला आर्थिक विषयात किती रस?

HomeपुणेBreaking News

Prashant Jagtap Vs BJP : सूर्यास्त होईपर्यंत स्थायी ची बैठक चालवली म्हणजे भाजपला आर्थिक विषयात किती रस?

Ganesh Kumar Mule Feb 25, 2022 3:50 PM

BJP Manifesto 2024 | भाजपचे संकल्पपत्र ‘विकसित भारता’चा रोड मॅप | माधव भांडारी
Taslima nasreen | लेखिका तस्लिमा नसरीन यांचे वक्तव्य चर्चेत!
Raj Thackeray | अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे? | मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे? 

सूर्यास्त होईपर्यंत स्थायी ची बैठक चालवली म्हणजे भाजपला आर्थिक विषयात किती रस?

: राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांचा भाजपवर आरोप

पुणे :  महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. कित्येक वर्षांचा सकाळच्या बैठकीचा असणारा पांयडा मोडून काही विशेष अर्थपूर्ण असणाऱ्या विषयांसाठी ही बैठक लांबविली गेली. आणि सूर्यास्त होईपर्यंत या बैठकीचे सत्र चालूच राहीले. काही विषय हे ऐनवेळेस आणण्यात आले हे विषय येत असताना आठ दिवसांपूर्वी कार्यपत्रिकेवर आणून हे विषय चर्चेसाठी का नाही ठेवले? हा एक मोठा गहन प्रश्न आहे. या सर्व गोष्टींवरून एक लक्षात येते की भारतीय जनता पार्टीला आर्थिक विषयांमध्ये किती रस आहे.या आर्थिक विषयांच्या माध्यमातून निवडणूक निधी गोळा करण्याचा प्रकार भाजप करू पाहत आहे. या सर्व संशयास्पद गोष्टींवरून पुणेकरांनी भाजपचा खरा चेहरा ओळखावा” असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांनी केला आहे.

जगताप म्हणाले, या विषयांची चर्चा होत असताना मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आगामी निवडणुका लक्षात घेता एखाद्या विषयाला विरोध म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विकासाला विरोध अशा प्रकारचे चित्र पुणेकरांसमोर जाऊ नये म्हणून आमच्याच प्रयत्नातून पुण्यात आलेला जायका प्रकल्प असेल किंवा नदी सुधार मधील अगोदरचे दोन टप्पे असतील याबाबत विरोध न करता सकारात्मक भूमिका घेतली होती. तरीसुद्धा आजच्या बैठकीमध्ये सर्वच गोष्टी संशयास्पद करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता वापरण्यात येणारा व्हीप निवडणुकीव्यतिरिक्त वापरला गेला. आज पहिल्यांदाच भाजप वर बहुमत असून सुद्धा या या बैठकीसाठी व्हीप देण्याची वेळ आली. त्याच बरोबर कुठलीही चर्चा करू नका कुठलिही उपसुचना मांडू नका अशा प्रकारची सक्त ताकीद व्हीपमध्ये द्यावी लागली. एकूणच भाजपचा आपल्या सदस्यांवर विश्वास नाही किंवा आपण आपण काहीतरी चुकीचं करतोय त्याला विरोध होऊ शकतो अशी पूर्ण खात्री असल्यामुळे भारतीय जनता पार्टी वर आज ही नामुष्की ओढवली. त्याचबरोबर आजच्या बैठकीत आणखी काही विषय आणता आले असते. परंतु पुन्हा सोमवारी इतर विषयांसाठी वेगळी बैठक लावण्यात आली या सर्व गोष्टींवरून एक लक्षात येते की भारतीय जनता पार्टीला आर्थिक विषयांमध्ये किती रस आहे.या आर्थिक विषयांच्या माध्यमातून निवडणूक निधी गोळा करण्याचा प्रकार भाजप करू पाहत आहे. यासर्व संशयास्पद गोष्टींवरून पुणेकरांनी भाजपचा खरा चेहरा ओळखावा” ,असे आवाहन मी यानिमित्ताने करत आहे. असे ही जगताप म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0