Congress Vs Governor | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन 

HomeपुणेBreaking News

Congress Vs Governor | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन 

Ganesh Kumar Mule Nov 21, 2022 1:26 PM

BBC | Congress | केंद्रातील मोदी सरकारने देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू केली आहे | अरविंद शिंदे
Congess Pune | काँग्रेसच्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानामुळे भारत देश हा सुदिन पाहत आहोत | अरविंद शिंदे
PMC Employees Union | वैद्यकीय योजना मोडीत काढणारा स्थायी समितीचा ठराव रद्द करा  | कामगार मेळाव्यात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिकेत 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन

      महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat singh koshyari) भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (sudhanshu trivedi)  यांच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे (pune city president Arvind Shinde) यांच्य नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळा येथे जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Congress Vs Governor Bhagat Singh koshyari)

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान व त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने नेहमीच करीत असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व भाजपाचा छुपा अजेंडा या संविधानिक पदावर बसून राबवित आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हे इतिहासात नोंद नसलेल्या गोष्टींचा खोटा दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करीत आहे. सावरकरांबद्दल बोलल्यावर  छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी जाणून बुजून केली जाते याच बरोबर काँग्रेसचे नेते मा. खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रचंड प्रतिसादालादेखील भारतीय जनता पार्टी घाबरली असून या यात्रेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रातील कोणीही व्यक्ती सहन करणार नसून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील जनता यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.’’

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे यांनी ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर सडकून टिका केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, रफिक शेख, अजित दरेकर, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, सोनाली मारणे, मेहबुब नदाफ, शेखर कपोते, द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सुजित यादव, सचिन आडेकर, विजय खळदकर, रमेश सकट, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, सुनिल शिंदे, सौरभ अमराळे, शिवराज भोकरे, संजय खडसे, अक्षय माने, हेमंत राजभोज, रोहन सुरवसे, रवि आरडे, राहुल तायडे, बंडू नलावडे, राजू साठे, वैशाली रेड्डी, ज्योती परदेशी, रेखा घलोत, प्राची दुधाणे, छाया जाधव, विकी खन्ना, अरूण वाघमारे, इंद्रजीत भालेराव, दिलीप लोळगे, लतेंद्र भिंगारे, फैय्याज शेख, संदिप मोरे, विनोद रणपिसे, अविनाश अडसूळ, भगवान कडू, राजू साठे आदीसह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.