Congress Vs BJP : भाजप शिष्टमंडळाची भेट निव्वळ स्टंटबाजी : भाजपच्या ५ वर्षाच्या कारभारात पुणे गेले ‘ खड्डयात ‘

HomeपुणेPMC

Congress Vs BJP : भाजप शिष्टमंडळाची भेट निव्वळ स्टंटबाजी : भाजपच्या ५ वर्षाच्या कारभारात पुणे गेले ‘ खड्डयात ‘

Ganesh Kumar Mule May 05, 2022 7:54 AM

BJP : MNS : Upcoming Election : महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती नाही! 
Prashant Jagtap | PMC Election 2022 | कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजप 
Pune Akashvani News | पुण्याबद्दल आकस नसेल तर प्रकाश जावडेकरांनी पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी

भाजपच्या ५ वर्षाच्या कारभारात पुणे गेले ‘ खड्डयात ‘

भाजप शिष्टमंडळाची भेट निव्वळ स्टंटबाजी

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महापालिकेचा कारभार ढासळला आणि जाता जाता रस्ते खोदाई करून भाजपने पुणे शहर अक्षरशः खड्डयात घातले, अशी खरमरीत टीका महाराष्ट् प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे .

गेले वर्ष, सव्वा वर्ष झाली शहराच्या मध्यवस्तीत रस्ता खोदाईची कामे चालू आहेत. या कामांमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून रहिवासी आणि दुकानदार वैतागले आहेत. रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने व्हावीत, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मोहन जोशी यांनी आज ( गुरुवारी ) दिले.

नवीन जलवाहिनी टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे अशा विकास कामांना काँग्रेस पक्षाचा विरोध नाही. परन्तु महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने पाच वर्ष ठोस कामे केली नाहीत आणि निवडणुका जवळ येताच घाईघाईने काम सुरू केली. त्यामुळे रस्ते खोदले गेले पण नियोजन नसल्याने कामे लांबत गेली, खोदाईनंतर रस्त्यांची डागडुजी अशास्त्रीय आणि निकृष्ट पद्धतीने केली जात आहे. काही ठिकाणी अर्धा रस्ता डांबरी आणि अर्धा काँक्रीटचा अशी अवस्था झाली आहे. सततच्या खोदकामामुळे वातावरणात धूळ पसरून रहिवासी, दुकानदार यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

महापालिकेच्या कामांबद्दल तक्रार करणारे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना नुकतेच दिले. हा प्रकार निव्वळ स्टंटबाजीचा आहे. दि. १५मार्च २०२२पर्यंत भाजपची सत्ता होती. त्या ५ वर्षाच्या कार्यकाळात उदासिनता दाखविली आणि आता सत्ता गेल्यावर विकासकामे लवकर व्हावीत याची आठवण भाजपला झाली, हा ढोंगीपणा पुणेकरांच्या लक्षात आला आहे. मुळा मुठा नदी सुधारणा, समान पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती अशा कोणत्याच मोठ्या प्रकल्पातही भाजपला कार्यक्षम दाखविता आलेली नाही, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0