सोनिया गांधींची घोषणा: कॉंग्रेस करणार ‘भारत जोडो यात्रा’
राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसच्या चिंतन शिबिरातत बोलताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वतीने काश्मीर ते कन्याकुमारी अशी भारत जोडो यात्रा (National Kanyakumari to Kashmir Bharat Jodo Yatra) करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले की, गांधी जयंतीनिमित्त आम्ही 2 ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा’ सुरू करणार आहोत. या यात्रेत सर्व युवक व सर्व नेते सहभागी होणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या, यावर्षी गांधी जयंतीपासून भारत जोडो यात्रा सुरू होईल. या प्रवासात आबालवृद्ध सर्व सहभागी होणार आहेत. यात्रेमुळे जातीय सलोखा राखण्यास मदत होणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावरही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. उदयपूरच्या चिंतन शिबिरात घेतलेल्या निर्णयांवर लवकरच अमलबजावणी केली जाईल, असे सोनिया म्हणाल्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याचे काँग्रेस अध्यक्षांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आम्ही मात करू, हा आमचा नवा संकल्प आहे.
COMMENTS