Sanjay Raut Vs Devendra Fadanvis | संभाजीराजे छत्रपती उमेदवारीवरून राऊत-फडणवीस आमने सामने 

HomeBreaking NewsPolitical

Sanjay Raut Vs Devendra Fadanvis | संभाजीराजे छत्रपती उमेदवारीवरून राऊत-फडणवीस आमने सामने 

Ganesh Kumar Mule May 29, 2022 8:53 AM

Rajya sabha Election | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा | महाराष्ट्रातून या दोन नेत्यांना संधी
University Senate Election | विद्यापीठ सिनेट निवडणूक | महाविकास आघाडी फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेची? | काँग्रेसचा स्वतंत्र पुरस्कृत पॅनेल 
Bhaiyyasaheb Jadhav : प्रभाग विकासाचे रोल मॉडेल स्थायी समिती अध्यक्षांच्याच प्रभागात का? लकी ड्रॉ काढून प्रभाग निवडा!  : राष्ट्रवादी नगरसेवक आणि प्रवक्ते भैयासाहेब जाधव यांची मागणी 

संभाजीराजे छत्रपती उमेदवारीवरून राऊत-फडणवीस आमने सामने

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही असा आरोप केला होता. त्यावर श्रीमंत शाहू महाराज यांनी राज्यसभा निवडणूक लढवणे हा संभाजीराजेंचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यात छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा मुद्दा येत नाही असं स्पष्ट मत मांडल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करुन दिल्याचा आऱोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी ते शाहू महाराजांच्या भेटीसाठी ते न्यू पॅलेसमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीराजेंच्या जागी उमेदवारी मिळालेले संजय पवारदेखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान तसंच नंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांमध्ये फोनवर चर्चा झाली असून कोल्हापूरला आपण भेटीला येऊ असं आश्वासन त्यांनी दिल्याचं सांगितलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “मी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. मी बऱ्याच वर्षांनी आज कोल्हापुरात आलो. उद्धव ठाकरेंनी सकाळी मला फोन करुन कोल्हापुरात आहात तर महाराजांचे आशीर्वाद घ्या आणि मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे असं सांगितलं. ठाकरे कुटुंब आणि महाराजांचं एक नातं आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब आले होते. उद्धव ठाकरेंनी महाराजांना फोनवर मी स्वत: कोल्हापुरात येईन असं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील आमच्या सामाजिक कार्यात आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद राहू देत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली”.

पुढे ते म्हणाले की, “आम्ही इथे एका आत्मीयतेने आलो आहोत. वयाने आम्ही त्यांच्यापेक्षा फार लहान आहोत. पण या घराण्याविषयी, कुटुंबाविषयी, शाहू महाराजांविषयी प्रबोधनकारांपासून एक नातं आहे, त्या नात्यानं आम्ही इथे येतो. याच्यात कोणतंही राजकारण नाही एवढंच सांगतो”.

भेटीनंतर बाहेर आल्यानंतर संजय राऊतांना फडणीवसांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपती आहेत ते..छत्रपतींचा असा अपमान करु नका. चुकीच्या माहितीवर ते बोलणार नाहीत, ते फार ज्येष्ठ आहेत. ज्या घराण्याचा वारसा पुढे घेऊन ते चालले आहेत तिथे चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्यं केली जात नाहीत”.

फडणवीस काय म्हणाले ?

“शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत त्यामुळे त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले असले तरी त्या संदर्भात मी बोलणार नाही. त्या संदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टपणे ट्विट करुन सांगितले आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो मी जे बोललो ते सत्य बोललो. मला असं वाटतं की प्रतिक्रिया बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचे दुःख आहे की काही किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करुन चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना समजत नाही की अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवतं आहेत. दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजेंमध्ये काहीतरी अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काम करणाऱ्यांबद्दल मला प्रचंड दुःख आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

संभाजीराजेंचे निर्णय व्यक्तिगत; श्रीमंत शाहू महाराजांचे स्पष्टीकरण

संभाजीराजे छत्रपती हे राजकारणात घेत असलेले सर्व निर्णय हे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. तरीही ते अशाप्रकारे चुकीचा संबंध जोडत असतील तर ते चुकीचे असल्याचा निर्वाळा श्रीमंत शाहू महाराज यांनी दिला आहे. तसंच शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात काही मुद्दय़ावर राज्यसभेच्या उमेदवारीबाबत ठरले होते. यातूनच ही उमेदवारी काही कारणांनी ते देऊ शकले नसतील तर त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द न पाळल्याची टीका होणेदेखील चुकीचे असल्याचे मत शाहू महाराजांनी व्यक्त केलं आहे.

सत्यच बोललो – संभाजीराजेंचा पवित्रा

राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून श्रीमंत शाहू महाराज यांचे विधान चर्चेत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी यावर समाज माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवताना ‘ मी सत्यच बोललो आहे’ असे म्हणत आपले विधान खरे असल्याचा दावा केला आहे.