G 20 in pune | G20 च्या निमित्ताने मागील ५ वर्षातील भाजपचे अपयश उघडे पडले |ओव्हर नाईट विकासाला आक्षेप | प्रशांत जगताप

HomeपुणेBreaking News

G 20 in pune | G20 च्या निमित्ताने मागील ५ वर्षातील भाजपचे अपयश उघडे पडले |ओव्हर नाईट विकासाला आक्षेप | प्रशांत जगताप

Ganesh Kumar Mule Jan 16, 2023 2:10 PM

Shivsena Vs BJP | CAG | महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन
Kasba By-Election | कसबा पोटनिवडणूक | भाजपच्या इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु  | महापालिकेकडे मागितले ना हरकत प्रमाणपत्र 
Airport Of Pune : विमानतळावरून राजकारण तापले  : भाजपमध्ये दुफळी असल्याचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा आरोप

G20 च्या निमित्ताने मागील ५ वर्षातील भाजपचे अपयश उघडे पडले |ओव्हर नाईट विकासाला आक्षेप | प्रशांत जगताप

G20 परिषदेच्या निमित्ताने सुरू असलेल्या कामांबाबत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काही प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण सुशोभीकरणावर आक्षेप नोंदविला आहे.

जगताप म्हणाले, “G20 परिषदेच्या निमित्ताने जगभरातील सुमारे वीस देशांचे प्रतिनिधी व मंत्री गट देशात येत आहेत. देशभरात घेण्यात येणाऱ्या विविध शहरातील बैठकांमध्ये पुणे शहराचा देखील नंबर लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या २० देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत करते.या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुणे शहराचे १५ दिवसात रूप बदलण्याचा प्रयत्न पुणे महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु ज्या २० देशातील प्रतिनिधी भारतात येणार आहेत त्यांना दाखवण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून जो काही ओवर नाईट विकास सुरू आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आक्षेप आहे. केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचे गेल्या पाच वर्षातील अपयश झाकण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी अक्षरश: पडदे लावत लपवाछपवी सुरू केली आहे.

आज G20 परिसराच्या निमित्ताने शहराची अवस्था सुधारण्याच्या नादात पुणे महानगरपालिका प्रशासनाची जी दमछाक होत आहे, त्याचे कारण केवळ गेल्या पाच वर्षातील भारतीय जनता पार्टीने पुणेकरांच्या पायाभूत सुविधांकडे केलेले दुर्लक्ष आहे. शहरातील रस्ते, फुटपाथ, उड्डाणपूल यांची घाईगडबडीमध्ये रंगरंगोटी करण्यात आली. कित्येक ठिकाणी गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच राडा- रोडा उचलला गेला आहे. कित्येक ठिकाणी राडा- रोडा उचलता न आल्याने पडदा टाकून तो कचरा झाकण्यात आलेला आहे. एकूणच काय तर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी पाहुण्यांच्या डोळ्यातच धूळफेक केली जात आहेत.
पुणे महानगरपालिकेचे वार्षिक बजेट दहा हजार कोटींचे असले तरी या पुणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षात विकास कामांचा राहिलेला बॅकलॉग म्हणून भरून काढण्यासाठी काही हजार कोटींची आवश्यकता असताना राज्य सरकारने अवघे 50 कोटी रुपये पाठवून पुणे शहराच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर, राज्यातील सर्वाधिक जीएसटी देणाऱ्या टॉप फाईव्ह शहरांपैकी एक शहर, आयटी हब, राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात नियमितपणे टॅक्स भरणाऱ्या पुणेकरांच्या सोयीसाठी ज्या गोष्टी गेल्या ५ वर्षात केल्या गेल्या नाहीत, त्या गोष्टी या पाहुण्यांसाठी केल्या जात आहेत. ठराविक पक्षाचा लोगो, पक्षाच्या नेत्यांचे फोटो डोळ्यासमोर ठेवत करण्यात आलेली रंगरंगोटी ही अक्षरशः हास्यस्पद आहे. पुणे विमानतळाच्या समोरचा रस्ता देखील कापड टाकून झाकण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी या पाहुण्यांची राहण्याची सोय आहे, त्या सेनापती बापट रस्त्यावरील काही ठिकाणे देखील शेडनेटचा कपडा टाकून झाकण्यात आलेली आहेत. गेल्या पाच वर्षात पुणेकरांच्या टॅक्सरुपी पैश्याची केवळ मर्जीतील ठेकेदारावर टेंडरद्वारे उधळपट्टी करत आपले खिसे भरणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींचे अपयश झाकण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी हा सगळा खटाटोप केलेला आहे.

यातील निकृष्ट दर्जाच्या कामांचा पडदा फाश करण्यासाठी उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दररोज एका ठिकाणी लाईव्ह करणार आहे. या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या टॅक्सरुपी पैश्यांची करण्यात आलेली उधळपट्टी, पाच वर्षात पुणेकरांना ज्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे, अशी सर्वच ठिकाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेकरांना लाईव्ह दाखवणार आहे”.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, “जी-२० ही आंतरराष्ट्रीय परिषद आहे.सरकारी कार्यक्रम आहे.भारताला त्याचे अध्यक्षपद मिळणे ही गौरवाचीच बाब आहे.मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष या परिषदेचे राजकीयीकरण करत आहे.प्रशासनही त्यांचेच सर्व ऐकत आहे.परिषदेच्या पुण्यात बैठका होत असून त्यासाठी पुण्याचे खासदार, आमदार यांनाही साधे निमंत्रणसुद्धा दिलेले नाही.लोकप्रतिनिधी असलेल्यांचे त्यांच्या स्वत:च्या शहराबद्दल काय म्हणणे आहे हे संयोजक म्हणून केंद्र सरकारने ऐकून तरी घ्यायला हवे होते, मात्र प्रशासनावर त्यांचा दबाव असल्याचे दिसते आहे. महापालिका आयुक्तांना आपण खासदार म्हणून स्वत: सहभाग तसेच शहरात सुरू असलेल्या दिशाहिन सुशोभीकरणाबाबत विचारणा केली होती, मात्र त्यांचा ‘सगळे चांगले आहे’ असा आश्चर्यकारक प्रतिसाद आला.हा सरकारी कार्यक्रम आहे तर भाजपने त्यासाठी समन्वय समिती कशी स्थापन केली? राजकीय व्यक्ती नको असे असेल तर मग या तथाकथित समन्वय समितीच्या प्रमुखाला थेट परिषदेत सहभाग कशासाठी?त्यांना तिथे स्थान कसे काय दिले जाते?”