Dust Storm : Maharashtra : महाराष्ट्राला धुळीच्या वाऱ्याचा धोका : हवामान खात्याचा इशारा

HomeBreaking Newsमहाराष्ट्र

Dust Storm : Maharashtra : महाराष्ट्राला धुळीच्या वाऱ्याचा धोका : हवामान खात्याचा इशारा

Ganesh Kumar Mule Jan 23, 2022 12:22 PM

Sharad Joshi Vicharmanch Shetkari Sanghatna | यापुढे शेतकऱ्याची बाजार समितीत लूट होणार नाही | विठ्ठल पवार राजे 
Shivchhatrapati Krida Purskar | शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी बालेवाडीत आयोजन | पुरस्कारार्थींची नावे जाणून घ्या 
Ink Attack | पालकमंत्र्यांवरील शाईहल्ल्याविरोधात पुणे भाजपकडून निषेध आंदोलन !

महाराष्ट्राला धुळीच्या वाऱ्याचा धोका

: हवामान खात्याचा इशारा

मुंबई : पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे येत्या १२ तासांमध्ये उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये  काही ठिकाणी धुळीचे वारे ताशी २० ते ३० किमी वेगानं येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.

धुळीच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी होण्याचीही शक्यता आहे. हवेतील धुलीकणांचं प्रमाण वाढल्यानं मुंबईत लोकल ट्रेन, आणि उंच इमारती काहीशा अंधुक दिसत असल्याचेही फोटो समोर आले आहेत. तसंच मुंबईत आज सकाळपासूनच हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

हवेत धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचा परिणाम मुंबईत काही ठिकाणी दिसून आला आहे. मुंबईतील उंचच उंच इमारती धुळीच्या वाऱ्यामुळे दिसेनाशा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0