Girish Bapat Vs Shreenath Bhimale | श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करा 

HomeपुणेBreaking News

Girish Bapat Vs Shreenath Bhimale | श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करा 

Ganesh Kumar Mule May 25, 2022 9:01 AM

MLA Sunil Tingre Vs Jagdish Mulik | सुनिल टिंगरे यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला | भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा टोला
Murlidhar Mohol | बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड! | भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची घणाघाती टीका
Supriya Sule | Ajit Pawar | मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू दिले नाही 

श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करा

: गिरीश बापट यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

पुणे : सॅलिसबरी पार्कमधील उद्यानाच्या नामांतर प्रकरणावरून भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.  स्थानिक रहिवाशांच्या भावनांची दखल न घेतल्याबद्दल माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार गिरीश बापट यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. आता हा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सॅलिसबरी पार्कमध्ये महापालिकेने उभारलेल्या उद्यानाला सॅलिसबरी पार्क उद्यान असे नाव द्यावे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यासाठी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट असोसिएशन गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. रहिवाशांनी याबाबत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही साकडं घातलं आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघात एका पत्रकार परिषदेनंतर खासदार बापट म्हणाले , ”सॅलिसबरी पार्क मधील रहिवासी गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. महापालिकेच्या विकास कामांना कुटुंबीयांची नावे देण्याची भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही, ते योग्य नाही. त्यामुळे रहिवाशांच्या भावनांची दखल घ्यावी असे मी भिमाले यांना सांगितले आहे. परंतु त्यांनी त्याबाबत कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली आहे.

”लोकप्रतिनिधी म्हणून मी गेल्या पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ शहरात कार्यरत आहे. परंतु कुठेही माझ्या कुटुंबातील लोकांची नावे महापालिकेच्या पैशाचे उभारलेल्या विकासकामांना दिलेली नाहीत. एखाद्या व्यक्तीचे समाजासाठी योगदान असेल तर त्यांची दखल घेणे, हा भाग वेगळा. परंतु, कुटुंबीयांची नावे विकासकामांना देणे योग्य नाही. भारतीय जनता पक्ष सदैव नागरिकांनी सोबतच असतो आणि या पुढील काळातही त्यांच्या बरोबरच राहील’

 

गिरीश बापट, खासदार

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0