Devendra Fadnavis | कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

HomeपुणेBreaking News

Devendra Fadnavis | कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Ganesh Kumar Mule Mar 03, 2023 3:27 AM

NCP Agitation | मुख्यमंत्र्यांनी गोविदांना आरक्षण देण्याची घोषणा करुन आरक्षणाच्या जनकांचा अपमान केला | राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन
Budget | Maharashtra | राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प | उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस
Supriya Sule Vs CM | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण 

कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पुण्यात कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसबा मतदारसंघातून धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर मात केली. बालेकिल्ल्यात पराभव झाल्यामुळे भाजपवर टीका होत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा येऊ इशारा दिला आहे.

“कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!,” असे देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले आहेत.

यामुळे लवकरच पुन्हा विधानसभा निवडणुका होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र महापालिका निवडणुकांचे काय, याबाबत मात्र काहीच उत्तर मिळत नाही. यामुळे कार्यकर्ते मात्र हवालदिल झाले आहेत.