Devendra Fadnavis | कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

HomeपुणेBreaking News

Devendra Fadnavis | कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Ganesh Kumar Mule Mar 03, 2023 3:27 AM

Japan Government | JICA | पुण्यातील नदी सुधार प्रकल्पा प्रमाणे वर्सोवा-विरार सी लिंकला जपान करणार संपूर्ण सहकार्य
Maharashtra Bhushan | पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली | केंद्रीय मंत्री अमित शहा
Mahavikas Aaghadi | पुणेकरांना मिळकतकरात 40 टक्के सवलत कायम ठेवावी आणि शास्ती कर रद्द करावा | विधी मंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन

कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पुण्यात कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसबा मतदारसंघातून धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर मात केली. बालेकिल्ल्यात पराभव झाल्यामुळे भाजपवर टीका होत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा येऊ इशारा दिला आहे.

“कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’!,” असे देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले आहेत.

यामुळे लवकरच पुन्हा विधानसभा निवडणुका होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र महापालिका निवडणुकांचे काय, याबाबत मात्र काहीच उत्तर मिळत नाही. यामुळे कार्यकर्ते मात्र हवालदिल झाले आहेत.